शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:30 IST

Sanjay Raut News: देशात युद्धाची चर्चा सुरू असताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. हास्यविनोद, दौरे सुरू आहेत. अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न करणाऱ्या विरोधकांची कीव वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडले, तसेच गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. तरीही मोदींनी त्यांना पदावर का ठेवले आहे, असा सवाल करत, २७ जणांचे हत्याकांड झाले, त्यात राज्यातील ६ माणसे आहेत. अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. अमित शाह चुन चुन के मारेंगे म्हणाले. मग मारा ना. कोणी अडवले? आमच्याच लोकांना चुन चुन के मारले आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्या देशाला पाकिस्तान आणि चीनसारखा शेजार लाभला आहे, त्या देशात सतत युद्धसराव सुरूच असतो. पण सध्या सरकारचे वर्तन पाहता ते युद्धाला सामोरे जात आहेत, असे वाटत नाही. मोदींनी अद्याप युद्ध सुरू केले नाही. त्यांची मानसिकता पाहावी लागेल, अशी टीका करतानाच, यु्द्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यात आले आहेत. घाबरून नेते आणि दहशतवादी पाकिस्तान सोडून पळाले आहेत, पण हे सर्व मीडियात सुरू आहे. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. 

कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर दिसत नाही

साधा एक अमुक तमूक मेला तरी राष्ट्रीय शोक पाळला जातो, सरकारी कार्यक्रम रद्द केला जातो. पण पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार दौऱ्यावर गेले. दुसऱ्या दिवशी बॉलिवूडच्या कार्यक्रमात जातात. कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर दिसत नाही. मोदींच्याही चेहऱ्यावर दुःख दिसले नाही. भाजपाच्या किंवा प्रमुख लोकांच्या दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला नाही. ज्या देशात युद्धाची तयारी असते त्या देशातील पंतप्रधान राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही. काश्मिरात एवढे मोठे हत्याकांड झाले, पण त्यानंतर आमचे पंतप्रधान बिहारला प्रचाराला गेले. पाकिस्तानला धडा शिकवू म्हणाले. देशात युद्धाची चर्चा सुरू असताना ९ तास पंतप्रधान नट-नट्यांबरोबर राहतात. गौतम अदानी यांच्या एका बंदराच्या उद्घाटनाला गेले. त्यांना मिठ्या मारल्या. आणखी एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याबरोबर हास्यविनोद करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर युद्धाबाबत कसलीही चिंता दिसत नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, विरोधकांनी अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. विरोधकांची कीव वाटते. विरोधकांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा आणि मग समर्थन द्यावे. हे सरकार नाहीत, हे नराधम आहेत. विरोधकांनी त्यांच्या चुकांना पाठिंबा देऊ नये, असे संजय राऊतांनी सांगितले.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी