शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

“मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 11:57 IST

Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. याचा धसका भाजपाने घेतला आहे. म्हणून लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पंतप्रधान मोदीच येऊन प्रचार करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी मतदार नाहीत. हे पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतले आहे. त्यामुळे वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा मोदींनी धसका घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे राजकीय फायदा दिसतो, तिथेच जातात. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला गेले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या तिथे त्यांना फायदा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सुमारे ८५ जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जास्त लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला गेले पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेले पाहिजे, तसेच म्यानमारच्या सीमेवर, लडाखलाही जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला. मालदिवशी भांडण केले हेही राजकारण आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, देशाची ८८ टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे असे अहवाल सांगतो. नोकरी मागणाऱ्यांना रामललाचे फुकट दर्शन देत आहेत. ८८ टक्के जनता नोकरी शोधत असेल तर हा देशच बेरोजगार झाला आहे. प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र पदवीधरांना ते पकोडे तळायला लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक