शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

“मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 11:57 IST

Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. याचा धसका भाजपाने घेतला आहे. म्हणून लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पंतप्रधान मोदीच येऊन प्रचार करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी मतदार नाहीत. हे पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतले आहे. त्यामुळे वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा मोदींनी धसका घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे राजकीय फायदा दिसतो, तिथेच जातात. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला गेले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या तिथे त्यांना फायदा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सुमारे ८५ जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जास्त लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला गेले पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेले पाहिजे, तसेच म्यानमारच्या सीमेवर, लडाखलाही जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला. मालदिवशी भांडण केले हेही राजकारण आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, देशाची ८८ टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे असे अहवाल सांगतो. नोकरी मागणाऱ्यांना रामललाचे फुकट दर्शन देत आहेत. ८८ टक्के जनता नोकरी शोधत असेल तर हा देशच बेरोजगार झाला आहे. प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र पदवीधरांना ते पकोडे तळायला लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक