शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 11:57 IST

Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. याचा धसका भाजपाने घेतला आहे. म्हणून लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पंतप्रधान मोदीच येऊन प्रचार करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी मतदार नाहीत. हे पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतले आहे. त्यामुळे वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा मोदींनी धसका घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे राजकीय फायदा दिसतो, तिथेच जातात. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला गेले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या तिथे त्यांना फायदा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सुमारे ८५ जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जास्त लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला गेले पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेले पाहिजे, तसेच म्यानमारच्या सीमेवर, लडाखलाही जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला. मालदिवशी भांडण केले हेही राजकारण आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, देशाची ८८ टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे असे अहवाल सांगतो. नोकरी मागणाऱ्यांना रामललाचे फुकट दर्शन देत आहेत. ८८ टक्के जनता नोकरी शोधत असेल तर हा देशच बेरोजगार झाला आहे. प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र पदवीधरांना ते पकोडे तळायला लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक