शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

“मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 11:57 IST

Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. याचा धसका भाजपाने घेतला आहे. म्हणून लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पंतप्रधान मोदीच येऊन प्रचार करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी मतदार नाहीत. हे पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतले आहे. त्यामुळे वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा मोदींनी धसका घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे राजकीय फायदा दिसतो, तिथेच जातात. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला गेले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या तिथे त्यांना फायदा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही

राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सुमारे ८५ जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जास्त लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला गेले पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेले पाहिजे, तसेच म्यानमारच्या सीमेवर, लडाखलाही जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला. मालदिवशी भांडण केले हेही राजकारण आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, देशाची ८८ टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे असे अहवाल सांगतो. नोकरी मागणाऱ्यांना रामललाचे फुकट दर्शन देत आहेत. ८८ टक्के जनता नोकरी शोधत असेल तर हा देशच बेरोजगार झाला आहे. प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र पदवीधरांना ते पकोडे तळायला लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक