शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सत्तेत संगीत खुर्चीचा खेळ, आरक्षणावर सरकार गंभीर नाही; अनिल परबांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 18:33 IST

जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करतं हे पाहावे लागेल असं अनिल परब म्हणाले.

मुंबई – निधी वाटपावरून जे शिंदे गटात गेले ते अजित पवारांवर नाराज होते, आज ते सगळे एकत्र आहेत. आता निधीवरून अजित पवार गटाचे लोक नाराज आहेत हे कळते. त्यामुळे हा सगळा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. कोणाला कधी खुर्ची मिळतेय, कोण कधी पळतंय हे दिसेल. जातीजातीत तणाव निर्माण होतोय. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायला हवे. परंतु सरकार या विषयात गंभीर नाही असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.

आमदार अनिल परब म्हणाले की, केवळ ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देतील अशा प्रकारचे वातावरण सरकारच्या वतीने केले जात आहे. नोंदी तपासल्या जातायेत. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्रे देतायेत. त्यात नवीन काही नाही. परंतु जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करतं हे पाहावे लागेल. जरांगे पाटलांनी डेडलाईन दिली आहे त्यामुळे थोड्या दिवसात कळेलच असं त्यांनी सांगितले.

आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाचं लक्ष

राहुल नार्वेकर हे वकील आहेत. त्यांना कायदा कळतो. लोकांच्या मनातले हे आमदार अपात्र झाले पाहिजेत अशी भावना आहे. जर नार्वेकर हे मनकवडे असतील तर ते लोकांच्या मनातला निर्णय देतील आणि पक्षाकडून आलेला निर्णय द्यायचा असेल तर वेगळा निर्णय देतील. परंतु यावर सुप्रीम कोर्टाचे बारकाईने लक्ष देतंय. या प्रकरणी जानेवारीच्या पहिला आठवड्यात सुनावणी आहे. त्यामुळे नार्वेकर काय निर्णय देतायेत त्यावर सुप्रीम कोर्टात काय व्हायचे ते होईल असं अनिल परब यांनी सांगितले.

तीजागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच जिंकणार

ज्या लोकसभा उमेदवारीवरून रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यात भांडणे आहेत. तिथे शिवसेनेचा उमेदवारच निवडून जाईल. अमोल किर्तीकर हेच लोकसभेत विजयी होतील याबाबत आम्ही ठाम आहोत. शिवसैनिकांच्या जोरावर, अपार मेहनत आणि कष्टावर तिथे उमेदवार निवडून गेलाय त्यामुळे आमच्या मनात शंका नाही. भाजपा ही जागा स्वत:कडे घेईल आणि शिंदेंकडे इतकी ताकद नाही ते ही जागा स्वत:कडे ठेवतील असा टोला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी लगावला.

त्याचसोबत आम्ही गद्दार म्हटल्यावर त्यांना राग येतो, परंतु याच गद्दारीच्या कहाण्या महाराष्ट्रासमोर येतायेत. बाळासाहेब जिवंत होते तेव्हाच्या या घटना आहे. बाळासाहेबांच्या पाठीतही या लोकांनी खंजीर खुपसला होता हे दिसून येते. शिवसैनिकांना हे गद्दारी करतात माहिती आहे. किर्तीकरांनी पत्रक काढून ते जनतेला सांगितले. नारायण राणे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये सर्वात पहिले नाव रामदास कदम यांचे होते. परंतु बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर कदम थांबले असा आरोपही परबांनी लावला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAnil Parabअनिल परबEknath Shindeएकनाथ शिंदे