शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सत्तेत संगीत खुर्चीचा खेळ, आरक्षणावर सरकार गंभीर नाही; अनिल परबांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 18:33 IST

जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करतं हे पाहावे लागेल असं अनिल परब म्हणाले.

मुंबई – निधी वाटपावरून जे शिंदे गटात गेले ते अजित पवारांवर नाराज होते, आज ते सगळे एकत्र आहेत. आता निधीवरून अजित पवार गटाचे लोक नाराज आहेत हे कळते. त्यामुळे हा सगळा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. कोणाला कधी खुर्ची मिळतेय, कोण कधी पळतंय हे दिसेल. जातीजातीत तणाव निर्माण होतोय. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायला हवे. परंतु सरकार या विषयात गंभीर नाही असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.

आमदार अनिल परब म्हणाले की, केवळ ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देतील अशा प्रकारचे वातावरण सरकारच्या वतीने केले जात आहे. नोंदी तपासल्या जातायेत. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्रे देतायेत. त्यात नवीन काही नाही. परंतु जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करतं हे पाहावे लागेल. जरांगे पाटलांनी डेडलाईन दिली आहे त्यामुळे थोड्या दिवसात कळेलच असं त्यांनी सांगितले.

आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाचं लक्ष

राहुल नार्वेकर हे वकील आहेत. त्यांना कायदा कळतो. लोकांच्या मनातले हे आमदार अपात्र झाले पाहिजेत अशी भावना आहे. जर नार्वेकर हे मनकवडे असतील तर ते लोकांच्या मनातला निर्णय देतील आणि पक्षाकडून आलेला निर्णय द्यायचा असेल तर वेगळा निर्णय देतील. परंतु यावर सुप्रीम कोर्टाचे बारकाईने लक्ष देतंय. या प्रकरणी जानेवारीच्या पहिला आठवड्यात सुनावणी आहे. त्यामुळे नार्वेकर काय निर्णय देतायेत त्यावर सुप्रीम कोर्टात काय व्हायचे ते होईल असं अनिल परब यांनी सांगितले.

तीजागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच जिंकणार

ज्या लोकसभा उमेदवारीवरून रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यात भांडणे आहेत. तिथे शिवसेनेचा उमेदवारच निवडून जाईल. अमोल किर्तीकर हेच लोकसभेत विजयी होतील याबाबत आम्ही ठाम आहोत. शिवसैनिकांच्या जोरावर, अपार मेहनत आणि कष्टावर तिथे उमेदवार निवडून गेलाय त्यामुळे आमच्या मनात शंका नाही. भाजपा ही जागा स्वत:कडे घेईल आणि शिंदेंकडे इतकी ताकद नाही ते ही जागा स्वत:कडे ठेवतील असा टोला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी लगावला.

त्याचसोबत आम्ही गद्दार म्हटल्यावर त्यांना राग येतो, परंतु याच गद्दारीच्या कहाण्या महाराष्ट्रासमोर येतायेत. बाळासाहेब जिवंत होते तेव्हाच्या या घटना आहे. बाळासाहेबांच्या पाठीतही या लोकांनी खंजीर खुपसला होता हे दिसून येते. शिवसैनिकांना हे गद्दारी करतात माहिती आहे. किर्तीकरांनी पत्रक काढून ते जनतेला सांगितले. नारायण राणे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये सर्वात पहिले नाव रामदास कदम यांचे होते. परंतु बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर कदम थांबले असा आरोपही परबांनी लावला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAnil Parabअनिल परबEknath Shindeएकनाथ शिंदे