शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

“आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:05 IST

Shiv Sena Thackeray Group News: विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena Thackeray Group News: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली, तर विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यातच आता विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

काही मिडिया रिपोर्टनुसार, विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडून विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र विधान परिषदेत आहेत. परंतु, या तीनही पक्षांमध्ये काँग्रेसचे सदस्य विधान परिषदेत जास्त असल्याने काँग्रेस आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. 

आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल

पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाने ठरवले की, विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे, तर ते शिवसेनेलाच मिळेल. कारण, शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. विधिमंडळ नेते आणि विधिमंडळ गटनेते यावर ठरवतील. तसेच आम्ही विधिमंडळ सचिवालयाला कळवले आहे. ज्या वेळेस विरोधी पक्षनेता करण्याबाबत निर्णय होईल, तेव्हा त्यांनी आमच्या पक्षाला निमंत्रित करून विचारणा करावी. त्यापूर्वी त्यांनी तसा निर्णय घेतला पाहिजे. आम्ही केवळ विरोधी पक्षनेतेपदावर दावा करून काही अर्थ नाही. आमचा दावा विरोधी पक्षनेतेपदावर आहेच, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा. येथे मात्र आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध जगजाहिर आहे. शिवाय कृषी साहित्य खरेदी घोटाळाही समोर आला. अशा परिस्थितीत त्यांनी नैतिक जबाबदारीने राजीनामा देणे आवश्यक होते. आगामी अधिवेशनात मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे