शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

डुप्लिकेट शिवसेनेचा नेता कोण हे सांगावे; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:04 IST

आमचे उद्धव ठाकरेंचे सरकार होते, एकदा दिल्लीत गेले. सर्व निर्णय इथे व्हायचे. दिल्लीची गुलामी आम्ही केली नाही असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - शिवसेनेला कधी दिल्लीवारी करायला लागत नाही. ही खरी शिवसेना असेल, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर तो दिल्लीत कशाला जाईल? मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीत जाऊन परवानगी मागण्याची गरज काय? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे दिल्लीत अर्ज घेऊन उभे राहिले नाहीत. डुप्लिकेट शिवसेनेने त्यांचा नेता कोण सांगावे. बाळासाहेब ठाकरे की मोदी-शाह आहेत ते सांगावे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, फडणवीस गेले, इतर नेते गेले मान्य करतो, तुमचे काय आहे? फारच विचित्र प्रकार आहे. आमचा विस्तार आम्ही करायचो. हा महाराष्ट्र आहे. पण यांचे ऊठसूठ दिल्लीत जायचे, ही महाराष्ट्राची शिवसेना नाही तर गुलामांची आहे. शिंदे यांचे हायकमांड दिल्लीत आहेत. शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतात आणि दिल्लीत जाऊन मुजरा करता. खरी शिवसेना कधी दिल्लीत जाऊन कुणासमोर झुकली नाही. प्रत्येक कामासाठी दिल्लीत जातात. खरी शिवसेना असती तर दिल्लीत जाण्याची गरज भासली नसती. महाराष्ट्रातले निर्णय इथेच व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमचे उद्धव ठाकरेंचे सरकार होते, एकदा दिल्लीत गेले. सर्व निर्णय इथे व्हायचे. दिल्लीची गुलामी आम्ही केली नाही. अमित शाहने निवडणूक आयोगावर दबाव टाकून शिवसेना दिलीय ना, मग चालवा. त्यांच्यासमोर झुकून उभे का राहतात. तुमच्यात हिंमत असेल तर मंत्रिमंडळ विस्तार इथं बसून करा. १ वर्ष झाले विस्तार होत नाही त्याचे कारण हे सरकार राहत नाही. या सरकारवर टांगती तलवार आहे. केवळ वेळ काढण्याचा हा प्रकार आहे अशी टीकाही राऊतांनी केली. 

अपघाताचाही इव्हेंट केला जातोय हे कधी झालं नाही ३ ट्रेन एकमेकांना आदळणे, सुरक्षा कवचचं काय झाले? बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन घोषणा करतात. ज्या ट्रेन देशात चालतायेत त्या सुरक्षित चालवा, वंदे भारत हा प्रचार आहे. जमिनीवर काहीच नाही. हा रेल्वे अपघात इतका भयंकर आहे की मृतांवर झाकायला कपडाही नव्हता. हा अपघात नव्हता तर घातपात आहे पण सरकार काय करतंय? या अपघाताची जबाबदारी कुणावर आहे? रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? लालबहादूर शास्त्रींच्या काळात अपघात झाल्यानंतर तातडीने त्यांनी राजीनामा दिला. अपघाताचाही इव्हेंट केला जातोय हे देशात कधी झालं नव्हते असं संजय राऊतांनी आरोप केला. त्याचसोबत सीबीआय चौकशी हा वेळकाढूपणा आहे. देशाचे पंतप्रधान राजीनामा देणार का? स्मशानातसुद्धा इव्हेंट करतायेत. अपघाताची पाहणी करायला गेले तेव्हा समोर गर्दी करून मोदी मोदी घोषणा दिल्या जातायेत. तांत्रिक विभागाचे अपयश आहे. सीबीआय काय करणार? असा सवालही उपस्थित केला. 

कुणाची ताकद किती जनता ठरवेलमहाविकास आघाडीत कुणाची ताकद किती हे जनता ठरवेल. आता बोलून काय उपयोग नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल. मुंबईतील काही भागात काँग्रेसची ताकद आहे हे मान्य आहे. परंतु मुंबई असो वा इतर महापालिका निवडणुकीबाबत आम्ही एकत्र बसून चर्चा करू. माध्यमांसमोर जागावाटप ठरत नाही. अजित पवार असतील आणि काँग्रेस नेते असतील, मुंबई असो वा इतर महापालिका निवडणुका असतील आमच्या सगळ्यांचा एकच सूर आहे एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढायच्या. प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा पराभव करायचा हा निर्धार आहे. आम्ही त्याबाबत लवकर भूमिका घेऊ अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे