शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यामध्ये ‘दहशतवाद’ निर्माण झालाय : रा. रं. बोराडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 14:29 IST

साहित्य संमेलनात सहभागी होणे आणि पुरस्कार मिळविणे ही लेखकाची ऊर्जा नव्हे.

ठळक मुद्देसंमेलनाची सूत्रं राजकारण्यांच्या हाती देऊ नयेत

पुणे : पूर्वीच्या काळात ग्रामीण साहित्यामध्ये जात कधी डोकवायची नाही. पण आज अमुक लेखक माझ्या जातीचा आहे. त्याच्याबद्दल चांगले बोलायचे तर बोला, नाहीतर गप्प बसा, अशी परिस्थिती आहे. लेखकांनाही समुहात सामील झाल्याशिवाय आपल्याला सुरक्षित वाटणार नाही, अशी भयानक अवस्था आहे. आज एक प्रकारची झुंडशाही सुरू झाली असून, साहित्यामध्येदहशतवाद’ निर्माण झाला आहे, अशा शब्दांत ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी वास्तवावर बोट ठेवले. भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘विचारभारती साहित्य संवाद अंतर्गत’ लेखक वाचक संवादात्मक कार्यक्रमात ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी दुसरे पुष्प गुंफले. यावेळी प्रसिद्ध गझलकार दीपक करंदीकर यांनी बोराडे यांचा परिचय करून दिला. भाविसाचे अध्यक्ष किशोर शशीतल, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद दातार उपस्थित होते.आज जातीयवाद प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारणी तो वाद चिघळवत आहेत. साहित्यात दहशतवाद वाढत गेला तर लेखकांना आपण का लिहायचे, हा प्रश्न पडेल. जातीयवादाने समीक्षक मारला. आज समीक्षेच्या नावाखाली जे प्रसिद्ध होत आहे. त्यात केवळ पुस्तकाची मांडणी असते. मग शेवटी छोटा अभिप्राय नोंदविला जातो. यापुढील काळात जातीयवादाबद्दल सजग राहणे हे हितावह आहे, असा इशाराही बोराडे यांनी दिला. प्रत्येक लेखकाचा एक अवकाश असतो आणि तो त्याला गवसावा लागतो. लेखक हा जन्मावा लागतो हे अमान्य करता येत नाही पण त्याची जडणघडण कशी झाली हे महत्त्वपूर्ण आहे. माझ्या मनात कोणत्या दिशेने जावे, याविषयी संभ्रम होता. पण व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ कथेमुळे लेखनाला प्रेरणा मिळाली आणि ‘वसुली’ ही कथा लिहिली. पुण्याचा आधार मिळाला नसता तर लेखक म्हणून दिसलो नसतो, अशी भावनाही बोराडे यांनी व्यक्त केली. आजमितीला माझ्या  ‘पाचोळा’ कादंबरीची दहावी आवृत्ती निघत आहे. या बोली भाषेतील कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले. साहित्य संमेलनात सहभागी होणे आणि पुरस्कार मिळविणे ही लेखकाची ऊर्जा नव्हे. ‘वाचक’ हाच लेखकाचा सर्वोच्च पुरस्कार असतो, असा सल्ला त्यांनी नवोदित कलाकारांना दिला. कोणत्याही चळवळीत स्वत:चे अस्तित्व विसरून एकरूप व्हायचे असते. आम्हाला आमचे अस्तित्व ग्रामीण साहित्य चळवळीत विरघळून टाकता आले नाही, म्हणून ही चळवळ अयशस्वी झाली असल्याची कबुलीही त्यांनी दिली.  किशोर शशीतल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मुकुंद दातार यांनीही विचार व्यक्त केले. राजन ढवळीकर यांनी आभार मानले.............संमेलनाची सूत्रं राजकारण्यांच्या हाती देऊ नयेतसाहित्य संमेलनाची सूत्र राजकारण्यांच्या हातात देऊ नयेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्या व्यक्ती आपला गोतावळा निर्माण करतात. 

त्यामुळे राजकारण्यांनी जोडे व्यासपीठाबाहेर ठेवावेत आणि रसिक म्हणून सहभागी व्हावे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ साहित्यिकांचेच असले पाहिजे, असे परखडपणे बोराडे यांनी आपले मत नोंदविले.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यTerrorismदहशतवाद