शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

साहित्यामध्ये ‘दहशतवाद’ निर्माण झालाय : रा. रं. बोराडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 14:29 IST

साहित्य संमेलनात सहभागी होणे आणि पुरस्कार मिळविणे ही लेखकाची ऊर्जा नव्हे.

ठळक मुद्देसंमेलनाची सूत्रं राजकारण्यांच्या हाती देऊ नयेत

पुणे : पूर्वीच्या काळात ग्रामीण साहित्यामध्ये जात कधी डोकवायची नाही. पण आज अमुक लेखक माझ्या जातीचा आहे. त्याच्याबद्दल चांगले बोलायचे तर बोला, नाहीतर गप्प बसा, अशी परिस्थिती आहे. लेखकांनाही समुहात सामील झाल्याशिवाय आपल्याला सुरक्षित वाटणार नाही, अशी भयानक अवस्था आहे. आज एक प्रकारची झुंडशाही सुरू झाली असून, साहित्यामध्येदहशतवाद’ निर्माण झाला आहे, अशा शब्दांत ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी वास्तवावर बोट ठेवले. भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘विचारभारती साहित्य संवाद अंतर्गत’ लेखक वाचक संवादात्मक कार्यक्रमात ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी दुसरे पुष्प गुंफले. यावेळी प्रसिद्ध गझलकार दीपक करंदीकर यांनी बोराडे यांचा परिचय करून दिला. भाविसाचे अध्यक्ष किशोर शशीतल, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद दातार उपस्थित होते.आज जातीयवाद प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारणी तो वाद चिघळवत आहेत. साहित्यात दहशतवाद वाढत गेला तर लेखकांना आपण का लिहायचे, हा प्रश्न पडेल. जातीयवादाने समीक्षक मारला. आज समीक्षेच्या नावाखाली जे प्रसिद्ध होत आहे. त्यात केवळ पुस्तकाची मांडणी असते. मग शेवटी छोटा अभिप्राय नोंदविला जातो. यापुढील काळात जातीयवादाबद्दल सजग राहणे हे हितावह आहे, असा इशाराही बोराडे यांनी दिला. प्रत्येक लेखकाचा एक अवकाश असतो आणि तो त्याला गवसावा लागतो. लेखक हा जन्मावा लागतो हे अमान्य करता येत नाही पण त्याची जडणघडण कशी झाली हे महत्त्वपूर्ण आहे. माझ्या मनात कोणत्या दिशेने जावे, याविषयी संभ्रम होता. पण व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ कथेमुळे लेखनाला प्रेरणा मिळाली आणि ‘वसुली’ ही कथा लिहिली. पुण्याचा आधार मिळाला नसता तर लेखक म्हणून दिसलो नसतो, अशी भावनाही बोराडे यांनी व्यक्त केली. आजमितीला माझ्या  ‘पाचोळा’ कादंबरीची दहावी आवृत्ती निघत आहे. या बोली भाषेतील कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले. साहित्य संमेलनात सहभागी होणे आणि पुरस्कार मिळविणे ही लेखकाची ऊर्जा नव्हे. ‘वाचक’ हाच लेखकाचा सर्वोच्च पुरस्कार असतो, असा सल्ला त्यांनी नवोदित कलाकारांना दिला. कोणत्याही चळवळीत स्वत:चे अस्तित्व विसरून एकरूप व्हायचे असते. आम्हाला आमचे अस्तित्व ग्रामीण साहित्य चळवळीत विरघळून टाकता आले नाही, म्हणून ही चळवळ अयशस्वी झाली असल्याची कबुलीही त्यांनी दिली.  किशोर शशीतल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मुकुंद दातार यांनीही विचार व्यक्त केले. राजन ढवळीकर यांनी आभार मानले.............संमेलनाची सूत्रं राजकारण्यांच्या हाती देऊ नयेतसाहित्य संमेलनाची सूत्र राजकारण्यांच्या हातात देऊ नयेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्या व्यक्ती आपला गोतावळा निर्माण करतात. 

त्यामुळे राजकारण्यांनी जोडे व्यासपीठाबाहेर ठेवावेत आणि रसिक म्हणून सहभागी व्हावे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ साहित्यिकांचेच असले पाहिजे, असे परखडपणे बोराडे यांनी आपले मत नोंदविले.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यTerrorismदहशतवाद