शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:27 IST

एक जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्री देण्यात आले. याचे पडसाद सर्वच मतदारसंघात उमटत आहे. शिवसैनिकांची नाराजी आहे असं थोरवे यांनी म्हटलं. 

कर्जत - राज्यातील पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीतील तणाव वाढला आहे. रायगड जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरेंना दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची लाट पसरली आहे. शिंदेंही नाराज असून ते दरे गावी गेल्याचं पुढे आले. आता यातच रायगडमधील कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही तटकरे यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध करत आमचा राजकीय अस्त झाला तरी तटकरेंना स्वीकारणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्यात रायगडकरांचे फार योगदान आहे. भरतशेठ असतील, महेंद्र दळवी आणि मी सुद्धा उठावाला पाठिंबा दिला. जो काही अन्याय सुरू होता त्याला वाचा फोडण्याचं काम शिंदेंच्या नेतृत्वात केले. राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा संघटनेला बळ देण्यासाठी भरतशेठ यांनी मंत्रि‍पदाचा त्याग केला होता. त्यावेळी जर भरतशेठ मंत्री झाले असते तर तेव्हाच ते पालकमंत्री झाले असते. आता पुन्हा एकदा राज्यात बहुसंख्येने महायुतीचं सरकार आले. उठावाच्या परिवर्तनातूनच भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आली. भरतशेठ यांना मंत्री केले, आमची एकच मागणी होती मविआ सरकार उद्धव ठाकरे यांनी जो चुकीचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही शिंदेंच्या उठावाला पाठिंबा दिला असं त्यांनी सांगितले.

तसेच रायगडचं पालकमंत्री भरतशेठला मिळावे ही रायगडकरांची इच्छा होती. भाजपाचे ३, शिवसेनेचे ३ आमदार आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून आम्ही रायगडचे पालकमंत्री भरतशेठला करावे अशी मागणी केली होती. या नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलो त्याचा सातत्याने पाठपुरावा केला नाही. भरतशेठ मंत्री नव्हते तरीही रायगडचे पालकमंत्रिपद उदय सामंत यांच्यारुपाने शिवसेनेकडेच होते. त्यामुळे हे पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच राहावे हीच आमची मागणी होती. तरीसुद्धा एक जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्री देण्यात आले. याचे पडसाद सर्वच मतदारसंघात उमटत आहे. शिवसैनिकांची नाराजी आहे. आम्ही वरिष्ठांना तात्काळ कळवलं. आम्ही प्रामाणिक काम करून महायुतीसोबत राहून असं राजकारण होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आमचा राजकीय अस्त झाला तरी आम्ही तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला.

दरम्यान, पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली ते चांगले झाले. विधानसभेची निवडणूक सगळ्यांनी पाहिली. महायुतीत असतानाही घटक पक्षाचे तिन्हीही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न झाला होता. असंतोष आमच्या मनात होता. शिवसेनेला पालकमंत्री पद मिळणार नसेल तर भाजपाला पालकमंत्रिपद देण्यासही आमची तयारी होती परंतु राष्ट्रवादीचा पालकमंत्री आम्ही कदापि स्वीकारणार नाही. महायुतीत राहून त्यांनी बेईमानी केली होती ती आम्हाला मान्य नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर बसून योग्य तो निर्णय घेतील याचा विश्वास आहे असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाsunil tatkareसुनील तटकरेAditi Tatkareअदिती तटकरेShiv Senaशिवसेना