शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'सैराट' प्रेमावरून लातूरमधील 'तंटामुक्त' गावात वादाची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 11:57 IST

तंटामुक्त गावात आता तणावपूर्ण शांतता

लातूर: दोन वर्षांपूर्वी आलेल्या सैराट चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. आर्ची आणि परशाच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण तिच्या कुटुंबीयांना लागताच गावात तणाव निर्माण होतो, असा प्रसंग सैराटमध्ये होता. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडीतही सध्या असाच तणाव निर्माण झाला आहे. सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला तंटामुक्त गाव म्हणून गौरवण्यात आलं होतं. मात्र एका सैराट प्रेम कहाणीमुळे गावातील शांतता भंग पावली आहे. दलित समाजातील एका मुलाचे मराठा समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन रुद्रवाडीतील वातावरण बिघडलं. या प्रकरणात पोलिसांकडे एफआयआर दाखल झाला आहे. 9 मार्च रोजी मराठा समाजाच्या 20 हून अधिक जणांनी दलित तरुणावर हल्ला केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. या तरुणाला वाचवण्यास गेलेल्यांनाही मारहाण करण्यात आली, अशीही नोंद एफआयआरमध्ये आहे. प्रेम संबंधाच्या संशयावरुन दलित तरुणावर हल्ला झाल्यानंतर आमच्यावरही अनेकदा हल्ले झाल्याचं सरपंच शालूभाई शिंदे यांचा मुलगा नितीन यांनी सांगितलं. 'आम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मात्र त्यावेळी कोणालाही अटक झाली नाही. तरुणावरील हल्ल्याच्या दोन दिवसानंतर काही लोक आमच्या घरात घुसले आणि काठ्यांनी आम्हाला मारहाण केली. त्याचवेळी आमच्या समाजाच्या एका मुलीचं लग्न सुरू होतं. आमच्या समाजातील काही लोक वधू-वरांसोबत मंदिरात गेले होते. आम्हाला त्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. आम्ही मंदिराच्या पायऱ्यांजवळूनच देवाला नमस्कार करतो. मात्र त्यादिवशी आम्हाला मंदिराच्या जवळही जाऊ देण्यात आलं नाही,' अशी माहिती नितीन यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात 22 जणांना अटक केली. यातील अनेकजण आता जामिनावर बाहेर आहेत. तक्रारकर्त्यांनी सामाजिक बहिष्काराची तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबद्दल मराठा समाजानं वेगळीच कहाणी सांगितली आहे. 'प्रेमसंबंधांमुळे काहीतरी वाद झाला होता. मात्र हा वाद काही लोकांपुरता मर्यादित आहे. दुसऱ्या समाजाचे लोक विनाकारण आमच्या पूर्ण समाजाला बदनाम करत आहेत,' असा आरोप हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या दत्तात्रय अतोलकर यांनी केला.   

टॅग्स :laturलातूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarathaमराठाDalit assaultदलितांना मारहाण