राज्यातील वीजटंचाईमुळे कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल
By Appasaheb.dilip.patil | Updated: September 16, 2017 19:08 IST2017-09-16T19:07:51+5:302017-09-16T19:08:01+5:30
वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पूरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

राज्यातील वीजटंचाईमुळे कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल
आप्पासाहेब पाटील
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पूरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा ८ तास व रात्री ८ तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पध्दतीने रात्री १० वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यन्त अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरु आहेत. ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोळसा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.