शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:25 IST

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे  - कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथे जोरदार पाऊस होत आहे़ पश्चिम बंगाल, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, रायलसीमा, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, केरळ येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़७ ते १० मे दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ ७ ते १० मेदरम्यान विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ४०़२, लोहगाव ४१़३, कोल्हापूर ३८़१, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४४़४, नाशिक ३९़३, सांगली ३९़९, सातारा ४१़१, सोलापूर ४२़६, मुंबई ३४़२, सातांक्रूझ ३४, अलिबाग ३६़४, रत्नागिरी ३३़४, पणजी ३५़१, डहाणू ३४़७, औरंगाबाद ४१़६, परभणी ४४, अकोला ४५़१, अमरावती ४४, बुलडाणा ४१़५, ब्रह्मपुरी ४५़१, चंद्रपूर ४४़६, गोंदिया ४२़५, नागपूर ४३़७, वर्धा ४४़९, यवतमाळ ४३़५़़़अमरावतीत उष्माघाताचे तीन बळीअमरावती : पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला असून उष्णतामानामुळे शनिवारी तीन जण मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वैद्यकीय प्रशासनाने वर्तविली आहे.शनिवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील इर्विन रुग्णालयाच्या फुटपाथवर एका ७० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. गाडगेनगर हद्दीतील शेतशिवारात अनिल हिंमत सिरसाठ (४०) हे मृतावस्थेत आढळून आले. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. बडनेरा हद्दीतील शिवारात शैलेश शंकर देव्हारे (३०) यांचा मृतदेह आढळून आला. तिन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल.मुंबईत दिवसा उनं रात्री उकाडामुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र समुद्री वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. परिणामी मुंबई तापत आहे. उष्ण, कोरडे वारे मुंबईकरांना तापदायक ठरत असून, ऊकाडा नागरिकांना घाम फोडत आहे. दिवसा ऊनं आणि रात्री ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबई त्रस्त आहे. सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील; आकाश अंशत: ढगाळ राहील. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात