शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:25 IST

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे  - कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथे जोरदार पाऊस होत आहे़ पश्चिम बंगाल, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, रायलसीमा, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, केरळ येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़७ ते १० मे दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ ७ ते १० मेदरम्यान विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ४०़२, लोहगाव ४१़३, कोल्हापूर ३८़१, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४४़४, नाशिक ३९़३, सांगली ३९़९, सातारा ४१़१, सोलापूर ४२़६, मुंबई ३४़२, सातांक्रूझ ३४, अलिबाग ३६़४, रत्नागिरी ३३़४, पणजी ३५़१, डहाणू ३४़७, औरंगाबाद ४१़६, परभणी ४४, अकोला ४५़१, अमरावती ४४, बुलडाणा ४१़५, ब्रह्मपुरी ४५़१, चंद्रपूर ४४़६, गोंदिया ४२़५, नागपूर ४३़७, वर्धा ४४़९, यवतमाळ ४३़५़़़अमरावतीत उष्माघाताचे तीन बळीअमरावती : पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला असून उष्णतामानामुळे शनिवारी तीन जण मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वैद्यकीय प्रशासनाने वर्तविली आहे.शनिवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील इर्विन रुग्णालयाच्या फुटपाथवर एका ७० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. गाडगेनगर हद्दीतील शेतशिवारात अनिल हिंमत सिरसाठ (४०) हे मृतावस्थेत आढळून आले. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. बडनेरा हद्दीतील शिवारात शैलेश शंकर देव्हारे (३०) यांचा मृतदेह आढळून आला. तिन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल.मुंबईत दिवसा उनं रात्री उकाडामुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र समुद्री वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. परिणामी मुंबई तापत आहे. उष्ण, कोरडे वारे मुंबईकरांना तापदायक ठरत असून, ऊकाडा नागरिकांना घाम फोडत आहे. दिवसा ऊनं आणि रात्री ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबई त्रस्त आहे. सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील; आकाश अंशत: ढगाळ राहील. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात