शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महाराष्ट्रात तेलंगणचा सव्र्हे

By admin | Published: August 22, 2014 2:07 AM

17 जुलै 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आंध्र शासनाने आपली विकास यंत्रणा या गावांमध्ये चालूच ठेवली.

शंकर चव्हाण - जीवती (जि़ चंद्रपूर)
महाराष्ट्र आणि आंध्रच्या सीमावादात अडकलेली जीवती तालुक्यातील 14 गावे महाराष्ट्राचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 17 जुलै 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आंध्र शासनाने आपली विकास यंत्रणा या गावांमध्ये चालूच ठेवली. आता नवनिर्मित तेलंगणा राज्याने या सीमेवरील गावात जनगणना व आर्थिक सव्र्हेक्षण सुरू केले आहे.
महाराष्ट्रातील परमडोली, तांडा, मुकादमगुडा, कोढा, लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, येसापूर, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा या गावांत तेलगंणने जनगणना व आर्थिक पाहणी सुरू केली आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार 1956च्या फाजल अली समितीने निर्धारित केलेल्या आंतरराज्य सीमारेषेनुसार ही 14 गावे महाराष्ट्रातीलच आहेत. या सर्व गावांत मराठी भाषक राहतात. सर्वोच्च न्यायालयानेही मराठी भाषकांना न्याय दिला आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाने या गावांतील विकासकामांकडे दुर्लक्ष केले. याचाच फायदा आंध्र शासनाने घेतला आणि आता तेलंगणा राज्यानेसुद्धा आपला ताबा कायम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
आजही या गावातील रहिवाशांची नावे आदिलाबाद  लोकसभा क्षेत्र व आसिफाबाद विधानसभा क्षेत्रच्या याद्यांमध्ये आहेत. रहिवासी निवडणुकीत दोन्ही राज्यांत मतदान करतात.  
 
> आंध्र सरकारने या गावांमध्ये वीजपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते, रोजगार हमी योजनेची कामे केली आहेत. एवढेच नव्हे, तर तेलगू भाषक शाळाही उघडल्या आहेत. 
> भीषण पाणीटंचाई बघता केंद्र शासनाच्या भारत निर्माण योजनेंतर्गत मोटार विद्युत पंप व हातपंपांची सोय करून आंध्र सरकारने ग्रामस्थांची तहान भागविली आहे. 
> महाराष्ट्र शासनाचा जलस्वराज्य प्रकल्प व महाजल प्रकल्प योजना या दोन्ही योजना निकामी ठरल्या आहेत. या योजना नावाला सुरू करण्यात आल्या. यात अनेकांनी मलिदा लाटून काम अर्धवट ठेवल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. 
> लेंडीगुडा, महाराजगुडा, परमडोली या गावांत आंध्र आणि महाराष्ट्र सरकारने रस्ते तयार केले आहेत. आंध्रच्या रस्त्यावरील डांबरीकरण शाबूत असून, महाराष्ट्राचा रस्ता बांधल्यानंतर काही दिवसांतच उखडला आहे.