शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वास्तव! राज्यातील तांत्रिक बिघाडाचा कोट्यवधी नागरिकांना फटका; हजारो तास देताय अंधाराशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 12:36 IST

तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत रविवारी काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता...

ठळक मुद्देमहावितरणने ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९ या महिन्यातील तांत्रिक बिघाडाची माहिती केली जाहीर

पिंपरी : राज्यात तांत्रिक बिघाडामुळे कोट्यवधी नागरिकांना अंधारात काढावे लागत आहे. महावितरणने प्रसिद्ध केलेल्या ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९च्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत रविवारी काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता. ऊर्जा मंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेत अशी घटना घडू नये या साठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र तांत्रिक बिघाड सातत्याने होत असून , हजारो तास ग्राहकांना अंधारात बसावे लागते आहे.

महावितरणने ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९ या महिन्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील तांत्रिक बिघाडाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात राज्यात तांत्रिक बिघाडाच्या १५ हजार ७४५ घटना घडल्या. त्यामुळे चार कोटी दहा लाख अठ्ठावीस हजार (४,१०,२८,४५७ ) नागरिकांना २० हजार १७६ तास अंधारात बसावे लागले. महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या पुणे विभागाचीही तीच अवस्था आहे. ऑक्टोबर २०१९मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या १ हजार ३७८ घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना १ हजार ६८७ तास अंधारात बसावे लागले. 

डिसेंबर २०१९ च्या माहितीनुसार रराज्यात तांत्रिक बिघाडाच्या १० हजार ९९४ घटना घडल्या. त्याचा राज्यातील पावणेतीन कोटी ( २,७८,१२,५८८)

नागरिकांना फटका बसला. या ग्राहकांना १५ हजार १६७ तास अंधारात बसावे लागले. डिसेंबर  २०१९ मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या ७१३  घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना ८८९ तास अंधारात बसावे लागले. 

दर महिन्याला हा चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे महावितरणसाठी बंधनकारक आहे,  मात्र जानेवारी २०२० पासून आजतागायत हा चार्टही प्रसिध्द झाला नसल्याची माहिती सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली.

------ 

     महावितरणने दरमहा तांत्रिक बिघाडाची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. गेल्या ३ वर्षांची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार उर्वरित महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त देखभाल दुरुस्ती साठी आठवड्यातून एक दिवस ( पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार असतो. त्यामुळे मुंबई प्रमाणे उर्वरित महाराष्ट्राकडे लक्ष देऊन तांत्रिक अंधारातून नागरीकांची सुटका करावी.

विवेक वेलणकर 

अध्यक्ष,  सजग नागरीक मंच

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकारNitin Rautनितीन राऊत