शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वास्तव! राज्यातील तांत्रिक बिघाडाचा कोट्यवधी नागरिकांना फटका; हजारो तास देताय अंधाराशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 12:36 IST

तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत रविवारी काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता...

ठळक मुद्देमहावितरणने ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९ या महिन्यातील तांत्रिक बिघाडाची माहिती केली जाहीर

पिंपरी : राज्यात तांत्रिक बिघाडामुळे कोट्यवधी नागरिकांना अंधारात काढावे लागत आहे. महावितरणने प्रसिद्ध केलेल्या ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९च्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत रविवारी काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता. ऊर्जा मंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेत अशी घटना घडू नये या साठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र तांत्रिक बिघाड सातत्याने होत असून , हजारो तास ग्राहकांना अंधारात बसावे लागते आहे.

महावितरणने ऑक्टोबर आणि डिसेंबर २०१९ या महिन्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील तांत्रिक बिघाडाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात राज्यात तांत्रिक बिघाडाच्या १५ हजार ७४५ घटना घडल्या. त्यामुळे चार कोटी दहा लाख अठ्ठावीस हजार (४,१०,२८,४५७ ) नागरिकांना २० हजार १७६ तास अंधारात बसावे लागले. महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या पुणे विभागाचीही तीच अवस्था आहे. ऑक्टोबर २०१९मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या १ हजार ३७८ घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना १ हजार ६८७ तास अंधारात बसावे लागले. 

डिसेंबर २०१९ च्या माहितीनुसार रराज्यात तांत्रिक बिघाडाच्या १० हजार ९९४ घटना घडल्या. त्याचा राज्यातील पावणेतीन कोटी ( २,७८,१२,५८८)

नागरिकांना फटका बसला. या ग्राहकांना १५ हजार १६७ तास अंधारात बसावे लागले. डिसेंबर  २०१९ मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या ७१३  घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना ८८९ तास अंधारात बसावे लागले. 

दर महिन्याला हा चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे महावितरणसाठी बंधनकारक आहे,  मात्र जानेवारी २०२० पासून आजतागायत हा चार्टही प्रसिध्द झाला नसल्याची माहिती सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली.

------ 

     महावितरणने दरमहा तांत्रिक बिघाडाची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. गेल्या ३ वर्षांची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार उर्वरित महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त देखभाल दुरुस्ती साठी आठवड्यातून एक दिवस ( पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार असतो. त्यामुळे मुंबई प्रमाणे उर्वरित महाराष्ट्राकडे लक्ष देऊन तांत्रिक अंधारातून नागरीकांची सुटका करावी.

विवेक वेलणकर 

अध्यक्ष,  सजग नागरीक मंच

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकारNitin Rautनितीन राऊत