शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Tauktae Cyclone: ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेला धोका; हाय अलर्ट जारी, महावितरणची यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 06:33 IST

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा; प्रशासनाने दिले निर्देश

ठळक मुद्देतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्याचक्रीवादळामुळे १४ मे १८ मेदरम्यान काही गाड्या अहमदाबादपर्यंतच धावणार आहेत.  पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार

मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अरबी समुद्रातील ‘तौत्के   चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह तडाखा बसणार आहे. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे. 

कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या ५० गाड्या रद्द  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या  १५ ते २१ मेदरम्यान दादर-भूज, बांद्रा टर्मिनस-भूज, मुंबई सेंट्रल-ओखा, बांद्रा टर्मिनस-भावनगर टर्मिनस, भावनगर-बांद्रा टर्मिनस भूज-बांद्रा टर्मिनस, पुणे-भूज यांसह ५०हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळामुळे १४ मे १८ मेदरम्यान काही गाड्या अहमदाबादपर्यंतच धावणार आहेत.        

अशी करणार व्यवस्थास्थानिक प्रशासन व पोलीस विभागाशी समन्वय ठेवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर ठिकाणांहून अभियंते व कर्मचारी संबंधित दुरुस्ती कामासाठी पाठविण्यात येणार आहेत.

पर्यायी व्यवस्थेतून करणार वीजपुरवठा सुरळीतकमी नुकसान व्हावे यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात येत आहे. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्यांचा समावेश आहे. सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. - विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण

मुंबईचे तापमान ३७.४०अरबी समुद्रात उठलेल्या ताउके या चक्रीवादळाने धडकी भरविली असतानाच दुसरीकडे मुंबईकरांना वाढत्या कमाल तापमानाने घाम फोडला आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, सरासरी कमाल तापमानाच्या तुलनेत शनिवारीचे कमाल तापमान तीन अंशांनी अधिक नोंदविण्यात आले. वाढते कमाल तापमान, चक्रीवादळाने हवामानात झालेला बदल, ढगाळलेली मुंबई आणि उकाड्यात झालेल्या वाढीने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. ३७.४ अंश ही नोंद यंदाच्या हंगामातील उच्चांक आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळmahavitaranमहावितरणwestern railwayपश्चिम रेल्वे