शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

खिंडीत गाठले! टाटांच्या टीसीएसने अंबानींच्या रिलायन्सला पछाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 08:55 IST

कोरोना व्हायरस आणि येस बँकेमुळे सोमवारी शेअर बाजारामध्येही घसरण झाली. गुंतवणूकदारांमध्ये असंतोष असूनही येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

ठळक मुद्देबीएसई वर येस बँकेचा शेअर 32 टक्क्यांनी वाढून 21.30 रुपये झाला. काल आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियाने रशियाला नामोहरम करण्यासाठी क्रूड ऑईलच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी केल्या.ओएनजीसीचे बाजार मुल्य 93000 कोटी रुपये झाले आहे.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला मागील 12 वर्षांतील सर्वात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अंबानींना शेअर बाजाराने काल जोरदार धक्का दिला. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये 12.35 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. ही घसरण एवढी होती की, शेअर बाजारात झालेल्या 1900 अंकांच्या पडझडीपैकी 500 अंक एकट्या रिलायन्सचे होते.  

रिलायन्सचा शेअर 1105 रुपयांवर आला आहे. ही ऑक्टोबर 2008 नंतर झालेली मोठी घसरण आहे. यामुळे दोन महिन्यांपूर्वी 10 लाख कोटींवर असलेल्या रिलायन्सचे बाजारमूल्य 7.05 लाख कोटी रुपये एवढे झाले आहे. रिलायन्स शेअरधारकांना तब्बल 1.08 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. 

काल आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियाने रशियाला नामोहरम करण्यासाठी क्रूड ऑईलच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी केल्या. याचा परिणाम मुंबई बाजारातही पहायला मिळाला. तेल उत्पादनात असलेल्या रिलायन्सलाही याचा फटका बसला. काल दिवसभरात सेन्सेक्स 2400 अंकांची घसरण नोंदवत दिवसाच्या अखेरीला 1941 अंकांनी कोसळला. यामधील 500 अंक एकट्या रिलायन्सचे होते. या घसरणीमुळे रिलायन्स आता टीसीएसपेक्षाही खालच्या क्रमांकावर गेली आहे. टीसीएसचे बाजारमुल्य 7.40 लाख कोटी रुपये आहे. 

Petrol prices: ५० रुपये लिटरने मिळू शकतं पेट्रोल; चकित झालात?, मग कसं ते वाचाच!

दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जाताय; वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही?

भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा?

सरकारी कंपनी ओएनजीसीचेही शेअर 16.26 टक्क्यांनी घसरले. तसेच बाजारमुल्यही 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. ओएनजीसीचे बाजार मुल्य 93000 कोटी रुपये झाले आहे.

कोरोना व्हायरस आणि येस बँकेमुळे सोमवारी शेअर बाजारामध्येही घसरण झाली. गुंतवणूकदारांमध्ये असंतोष असूनही येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. बीएसई वर येस बँकेचा शेअर 32 टक्क्यांनी वाढून 21.30 रुपये झाला. शुक्रवारी बीएसईवर येस बँकेचे शेअर्स 16.20 रुपयांवर बंद झाले. ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित असल्याच्या सरकारच्या आश्वासनामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत आला आहे. पण येस बँकेला वाचवण्यासाठी धावलेल्या देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या समभागाच्या किंमतीत घट झाली. सोमवारी एसबीआयचे शेअर्स 5.60 टक्क्यांनी घसरून 254 रुपयांवर गेले. शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स बीएसईवर 260 रुपयांवर बंद झाले.

टॅग्स :Relianceरिलायन्सRatan Tataरतन टाटाTataटाटाMukesh Ambaniमुकेश अंबानीshare marketशेअर बाजारOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प