शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

बरं झालं युती तुटली, तरुण भारतमधून शिवसेनेवर टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:42 IST

हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे.

मुंबई - हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे. दरम्यान, भाजपा आणि शिवसेनेमधील तीस वर्षे जुनी युती तुटल्यानंतर संघाशी संबंधित असलेल्या तरुण भारत या वृत्तपत्रामधून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तीन दशकांपर्यंत चाललेली भाजपा आणि शिवसेनेमधील युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेपणामुळे तुटल्याचा आरोप तरुण भारतमधून करण्यात आला आहे. तसेच बरं झालं युती तुटली, ही आता ही केवळ राजकीय भावनानाही तर जनभावनाही झालेली आहे, असा टोलाही शिवसेनेला लगावण्या आला आहे.

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये  मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला होता. मात्र दोन्ही पक्षांनी आपापल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतल्याने अखेरीत मतभेदांचे पर्यावसान युती तुटण्यामध्ये झाले होते. दरम्यान, मंगळवारी प्रकाशित झालेल्या तरुण भारतच्या संपादकीय लेखातून युती तुटण्याचे खापर शिवसेनेवर फो़डण्यात आले आहे. बरं झालं युती तुटली, ही केवळ राजकीय भावनानाही तर जनभावनाही झालेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर जवळपास तीन दशक चाललेली भाजपा आणि शिवसेना युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेल्या भूमिकेमुळे अखेर तुटली आहे. असुसंस्कृत आणि अविवेकी मित्रापेक्षा सभ्य विरोधक परवडले, या न्यायाने युती तुटल्यावर भाजपा कार्यकर्तेच नाही तर सामान्य जनतेही हीच भावना आहे, असा टोला या लेखातून शिवसेनेला लगावण्यात आला आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात शिवसैनिकांनी केलेल्या शेरेबाजीमुळे बरेच झाले वेगळे झालो, या भावनेवर शिक्कामोर्तबच झाले आहे, असेही या लेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युतीत शिवसेनेची अवस्था भांडखोर जोडीदारासारखी झाली आहे. शिवसेनेने भाजपासोबतची युती आपल्या आततायी भूमिकेमुळे तोडली आहे. शिवसेना हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागली आहे. यात भाजपाचे तात्कालिक नुकसान दिसत असले तरी दीर्घकालिन फायदा आहे. शिवसेनेचा मात्र, दीर्घकालिन नुकसान आहे, असा टोलाही शिवसेनेलेला लगावण्यात आल आहे.

शिवसेनेने आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात तो दंग आहे. भाजपासारखा मित्रपक्ष गमावून आपण केवढी मोठी चूक केली, हे जेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, आपल्या या चुकीची किंमत शिवसेनेला आयुष्यभर मोजावी लागेल, असा इशाराही या लेखातून शिवसेनेला देण्यात आला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण