शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

बरं झालं युती तुटली, तरुण भारतमधून शिवसेनेवर टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:42 IST

हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे.

मुंबई - हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे. दरम्यान, भाजपा आणि शिवसेनेमधील तीस वर्षे जुनी युती तुटल्यानंतर संघाशी संबंधित असलेल्या तरुण भारत या वृत्तपत्रामधून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तीन दशकांपर्यंत चाललेली भाजपा आणि शिवसेनेमधील युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेपणामुळे तुटल्याचा आरोप तरुण भारतमधून करण्यात आला आहे. तसेच बरं झालं युती तुटली, ही आता ही केवळ राजकीय भावनानाही तर जनभावनाही झालेली आहे, असा टोलाही शिवसेनेला लगावण्या आला आहे.

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये  मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला होता. मात्र दोन्ही पक्षांनी आपापल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतल्याने अखेरीत मतभेदांचे पर्यावसान युती तुटण्यामध्ये झाले होते. दरम्यान, मंगळवारी प्रकाशित झालेल्या तरुण भारतच्या संपादकीय लेखातून युती तुटण्याचे खापर शिवसेनेवर फो़डण्यात आले आहे. बरं झालं युती तुटली, ही केवळ राजकीय भावनानाही तर जनभावनाही झालेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर जवळपास तीन दशक चाललेली भाजपा आणि शिवसेना युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेल्या भूमिकेमुळे अखेर तुटली आहे. असुसंस्कृत आणि अविवेकी मित्रापेक्षा सभ्य विरोधक परवडले, या न्यायाने युती तुटल्यावर भाजपा कार्यकर्तेच नाही तर सामान्य जनतेही हीच भावना आहे, असा टोला या लेखातून शिवसेनेला लगावण्यात आला आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात शिवसैनिकांनी केलेल्या शेरेबाजीमुळे बरेच झाले वेगळे झालो, या भावनेवर शिक्कामोर्तबच झाले आहे, असेही या लेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युतीत शिवसेनेची अवस्था भांडखोर जोडीदारासारखी झाली आहे. शिवसेनेने भाजपासोबतची युती आपल्या आततायी भूमिकेमुळे तोडली आहे. शिवसेना हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागली आहे. यात भाजपाचे तात्कालिक नुकसान दिसत असले तरी दीर्घकालिन फायदा आहे. शिवसेनेचा मात्र, दीर्घकालिन नुकसान आहे, असा टोलाही शिवसेनेलेला लगावण्यात आल आहे.

शिवसेनेने आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात तो दंग आहे. भाजपासारखा मित्रपक्ष गमावून आपण केवढी मोठी चूक केली, हे जेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, आपल्या या चुकीची किंमत शिवसेनेला आयुष्यभर मोजावी लागेल, असा इशाराही या लेखातून शिवसेनेला देण्यात आला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण