शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 18:50 IST

तुमच्याकडे विषारी सापांचा वावर वाढलाय तो आधी ठेचून काढा. राज्यातील जनता नशीबवान आहे. आणखी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले असते असं भाजपा आमदार प्रविण दरेकरांनी म्हटलं.

मुंबई – उद्धव ठाकरे कपाळकरंटे असून कोविड काळातील भ्रष्टाचाराने कलंकित झाले आहेत. अलीकडच्या काळात ते वैफल्यग्रस्त झालेत. तुमच्या हाडाची काडे झालीत ते महाराष्ट्रातील जनतेला दिसून आले. बाळासाहेबांनानंतर उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे ही लोकशाहीची श्रृंखळा आहे की घराणेशाही. केवळ कुटुंबाचा विचार करून तुम्ही सत्ता उपभोगली. शिवसैनिकांचा विचार केला नाही अशा शब्दात भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

प्रविण दरेकर म्हणाले की, तुमची सत्ता असताना घरकोंबडे म्हणून तुम्ही घरात बसला. १५ दिवस आराम करायला विदेशात गेले होते. पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेले होते. शिवसैनिकांची काळजी करण्याऐवजी भाजपा कार्यकर्त्यांची काळजी करता, ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर सतरंज्या उचलल्या त्यांना तुम्ही काय दिले. स्वत: मुख्यमंत्री झालात, मुलगा मंत्री झाला, शिवसैनिक वाऱ्यावर सोडले. ज्यांची घरे बर्बाद केली त्यांच्याकडे पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ नाही. उद्धव ठाकरेंच्या बाजूला सुषमा अंधारे, प्रियंका चर्तुवेदी होत्या. शिवसेना नेते कुठे आहेत. उद्धव ठाकरेंनी केंद्र, राज्य सरकारच्या योजना समजून घ्या, लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला कळाली तर डोळे पांढरे होतील असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

तसेच चंद्रयान ३ ने चंद्रावर भारताचा ठसा उमटवला. मोदी सरकारच्या द्रष्टेपणावर जनतेचा विश्वास आहे, तुम्ही लोकांचा विश्वास गमावला. लोकांचा विश्वास मातीत घातला. उद्धव ठाकरेंच्या नावातच उद्धटपणा, अहंकार आहे. भ्रमिष्ट झाल्यासारखे उद्धव ठाकरे बोलतात, गद्दार बोलल्याशिवाय उद्धव ठाकरेंचा दिवस पुढे ढकलला जात नाही. तुमच्याकडे विषारी सापांचा वावर वाढलाय तो आधी ठेचून काढा. राज्यातील जनता नशीबवान आहे. आणखी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले असते असा घणाघातही प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

दरम्यान, शेतकरी, वीज, पाणी या सर्व विषयांवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार काम करतंय. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून तुम्ही काय दिवे लावलेत हे जनतेने पाहिले आहे. आमच्या नेत्यांना वेडेवाकडे बोलाल तर तुमचेही कपडे काढायला मागेपुढे बघणार नाही. संयमांचा उद्रेक झाला तर भाजपा कार्यकर्ते कृतीतून ते दाखवून देतील. उद्धव ठाकरेंनी टोमणे न मारता, कोट्या न करता, यमक न जुळवता सलग १ तास महाराष्ट्राच्या विकासावर बोलावे. जर उद्धव ठाकरेंनी तसे केले तर त्यांचा जाहीर सत्कार भाजपाकडून केला जाईल असं आव्हानही प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpravin darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा