शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगावर उपचार न घेणे इतरांसाठी घातक

By admin | Updated: March 24, 2015 02:29 IST

क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे.

सावधान : एका रुग्णाकडून वर्षात १० ते १५ जणांना संसर्गाचा धोकापूजा दामले- मुंबईक्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे. क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरू न करणे, हे अत्यंत घातक ठरते. हा रोग टप्प्याटप्प्याने वाढत नाही. अचानक उसळून येतो. यामुळेच प्रत्येक दिवस धोक्याची तीव्रता वाढवत असतो. जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या, झोपडपट्टीसदृश ठिकाणी राहणाऱ्या लोकांना क्षयरोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.भारतात दरवर्षी सुमारे ८ ते १० लाख नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात. ३० लाख क्षयरोग रुग्ण दरवर्षी उपचार घेत असतात. भारतात क्षयरोगाचे विषाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. आपल्याकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीमुळे क्षयरोग वेगाने पसरतो, असे ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. समीर गरदे यांनी सांगितले. क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण भारतात वाढत आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, भारतात २ ते ३ मिनिटाला एकाचा मृत्यू हा क्षयरोगामुळे होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र अजूनही याबाबत म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. यामुळे क्षयरोगाचे काही रुग्ण मध्येच उपचार सोडून देतात. मध्येच उपचार सोडल्याने काही दिवसांतच क्षयरोगाचे विषाणू औषधांना दाद देत नाहीत. अशा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास त्यालाही औषधांना दाद न देणारा क्षयरोग होतो, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे डॉ. गरदे यांनी सांगितले.च्क्षयरोग हा फक्त फुप्फुसांना नाही, तर केस आणि नखे सोडून शरीरातील सर्व अवयवांना होऊ शकतो. फुप्फुसांना होणाऱ्या क्षयरोगाचे प्रमाण ४० टक्के इतके असते. च्मणका, हीप बोन, सांधे, मेंदू या अवयवांनादेखील क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचबरोबरीने काही वेळा क्षयरोग झाल्यास घशात गाठी येतात. फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य असतो. च्इतर कोणतेही क्षयरोग संसर्गजन्य नसतात. या क्षयरोगावर २४ ते २७ महिने उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होतो.