शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

निर्णय न देता वेळ काढतायेत; राहुल नार्वेकरांच्या घाना दौऱ्यावर संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:50 IST

राज्यात संविधान, घटना, लोकशाहीचा गेल्या वर्षभरापासून खून करताय, बेकायदेशीर सरकारला पाठिंबा देताय, तारखावर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवताय असा आरोप त्यांनी केला.

मुंबई – महाराष्ट्रात लोकशाहीचा खून होतोय, तारीख पे तारीख दिली जातेय. १ वर्ष संविधानाच्या विरोधात घटनेच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन सरकार चालवलं जातंय. निर्णय प्रक्रियेला विलंब व्हावा म्हणून अध्यक्ष परदेश दौऱ्यावर गेले आहेत असा आरोप ठाकरे गटाचा खासदार संजय राऊतांनी करत भाजपावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, घाना नावाचा देश आहे. महाराष्ट्रातच काय देशातील ९० टक्के लोकांना हा देश माहिती नाही. तिथेही लोकशाही अस्थिर असते. तिथे कॉमनवेल्थच्या मैदानावर आमच्या विधानसभेचे अध्यक्ष लोकशाहीवर प्रवचन द्यायला चालले आहेत. पण या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करून तुम्ही घानाला चाललाय हे लज्जास्पद आहे. राज्यात संविधान, घटना, लोकशाहीचा गेल्या वर्षभरापासून खून करताय, बेकायदेशीर सरकारला पाठिंबा देताय, तारखावर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवताय असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत माझ्या माहितीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल लवकर द्यावा असे आदेश दिलेत. त्यातून पळ काढण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची वर्णी घाना या देशात जाणाऱ्या शिष्टमंडळात घाईघाईत लावण्यात आली. मूळ शिष्टमंडळात विधानसभा अध्यक्षांचे नाव नव्हते. परंतु इथं निर्णयाला वेळ करायचा आहे त्यासाठी विधानसभा अध्यक्षांना घानाला घेऊन गेलेत. ही आमच्या देशाच्या लोकशाहीची खिल्ली आहे. जागतिक मंचावर लोकशाहीचे किर्तन करण्यासाठी चाललेत. किती जणांना घाना माहित्येय? आधी इथला निर्णय द्या मग घानाला जा असं विधान संजय राऊतांनी नार्वेकरांच्या परदेश दौऱ्यावर केले.

दरम्यान, जो असेल तो निर्णय द्या, तुम्ही योग्य आहात अशी खात्री असेल तसा निर्णय द्या. जर निर्णय देत नसाल तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही निर्णय देऊ शकत नाही तुम्ही फक्त वेळ काढताय. तुम्हाला अपात्र करायचे नसेल तर नका करू, तुम्हाला घटनाबाह्य सरकारला वाचवायचे आहे म्हणून वेळ काढताय म्हणून घानाला दौऱ्यावर जात आहेत असंही राऊतांनी म्हटलं.

...म्हणून शिवसेना फोडण्यात आली.  

मराठी माणसाचा आवाज कमजोर व्हावा, मराठी माणसाच्या अस्मितेशी लढण्याची ताकद कमजोर व्हावी, स्वाभिमानाला धक्का बसावा यासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या पाठीत भाजपाने खंजीर खुपसला. शिवसेना फोडली त्याचे परिणाम असे महाराष्ट्रीयन लोकांना मुलुंड, मलबार इतकेच नाही परळ, लालबागला जागा द्यायचे नाही असं त्यांचे प्लॅनिंग आहे. आम्ही आंदोलन केली, यापुढे करत राहू परंतु हे आम्ही चालू देणार नाही असं संजय राऊत यांनी इशारा दिला.

मणिपूर हे सरकारचे अपयश

मणिपूरची स्थिती भयंकर आहे. सरकार, गृह विभाग, संरक्षण खाते सर्वांचे हे अपयश आहे. नवीन संसद भवन बनवले परंतु त्यात चर्चा करू दिली नाही. देशाला आग लावण्याचे षडयंत्र तर रचलं जात नाही ना? सरकार कोणत्याप्रकारे काम करतंय हे जनता पाहत आहे अशी टीका राऊतांनी केंद्र सरकारवर केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपा