शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कांदा घ्या कांदा, ५ रुपये किलो कांदा... शेतकऱ्याची हुशारी, स्वतःच झाला व्यापारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 11:15 IST

कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.

तासगाव : शहरांमध्ये छोट्या मालगाड्यांमधून भाजीपाला, कांदा-बटाटे विकणारे शेतकरी किंवा त्यांच्याकडून गोळा करून विकणारा व्यापारी आपण बऱ्याचदा पाहतो. मात्र, कांद्याचे दर कमालीचे घरलेले असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे झाले आहेत. कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने रस्त्याशेजारी विकावा लागल्याचे चित्र सध्या तासगाव-सांगली रस्त्यावर दिसत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला प्रती किलो 2-3 रुपयांचा दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांचे आणि व्यापाऱ्यांचे फावले आहे. बाजारात सध्या 20 रुपयांच्या दराने कांदा ग्राहकांना विकला जात आहे. मात्र, शेतकऱ्य़ांना 2 ते 3 रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे अडत्यांच्या कात्रीत पिचलेला शेतकरी अगतिकपणे मिळेल त्या दराने कांदा विकू लागला आहे. यासाठी एखादा ट्रक भाड्याने घेऊन राज्य महामार्ग, गावोगावी जात रस्त्याशेजारीच पाच रुपये किलोने कांदा विकत आहे. 

याचा फायदा मात्र ग्राहकांना होत आहे. बाजारात 20 रुपये मोजण्यापेक्षा या शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने या मालगाड्यांजवळ झुंबड उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सीमाभागातील जमखंडीच्या शेतकऱ्याने कांदा कोल्हापूरच्या बाजारात विकण्यास आणला होता. मात्र, त्याला तेथे तीन रुपये दर सांगण्यात आला. सांगलीतही तोच दर सांगितला गेला. यामुळे या शेतकऱ्याने निराश होत रस्त्याशेजारीच ट्रक उभा करून अवघ्या 5 रुपये किलोने कांदा विकण्यास सुरुवात केली. यामुळे तेथील स्थानिकांमध्ये ही बातमी पसरताच काही वेळातच त्यांनी गर्दी करून गाड्या भरून कांद्याची पोती नेली. यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.

टॅग्स :onionकांदाKarnatakकर्नाटकSangliसांगली