शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कांदा घ्या कांदा, ५ रुपये किलो कांदा... शेतकऱ्याची हुशारी, स्वतःच झाला व्यापारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 11:15 IST

कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.

तासगाव : शहरांमध्ये छोट्या मालगाड्यांमधून भाजीपाला, कांदा-बटाटे विकणारे शेतकरी किंवा त्यांच्याकडून गोळा करून विकणारा व्यापारी आपण बऱ्याचदा पाहतो. मात्र, कांद्याचे दर कमालीचे घरलेले असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे झाले आहेत. कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने रस्त्याशेजारी विकावा लागल्याचे चित्र सध्या तासगाव-सांगली रस्त्यावर दिसत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला प्रती किलो 2-3 रुपयांचा दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांचे आणि व्यापाऱ्यांचे फावले आहे. बाजारात सध्या 20 रुपयांच्या दराने कांदा ग्राहकांना विकला जात आहे. मात्र, शेतकऱ्य़ांना 2 ते 3 रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे अडत्यांच्या कात्रीत पिचलेला शेतकरी अगतिकपणे मिळेल त्या दराने कांदा विकू लागला आहे. यासाठी एखादा ट्रक भाड्याने घेऊन राज्य महामार्ग, गावोगावी जात रस्त्याशेजारीच पाच रुपये किलोने कांदा विकत आहे. 

याचा फायदा मात्र ग्राहकांना होत आहे. बाजारात 20 रुपये मोजण्यापेक्षा या शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने या मालगाड्यांजवळ झुंबड उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सीमाभागातील जमखंडीच्या शेतकऱ्याने कांदा कोल्हापूरच्या बाजारात विकण्यास आणला होता. मात्र, त्याला तेथे तीन रुपये दर सांगण्यात आला. सांगलीतही तोच दर सांगितला गेला. यामुळे या शेतकऱ्याने निराश होत रस्त्याशेजारीच ट्रक उभा करून अवघ्या 5 रुपये किलोने कांदा विकण्यास सुरुवात केली. यामुळे तेथील स्थानिकांमध्ये ही बातमी पसरताच काही वेळातच त्यांनी गर्दी करून गाड्या भरून कांद्याची पोती नेली. यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.

टॅग्स :onionकांदाKarnatakकर्नाटकSangliसांगली