शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

कांदा घ्या कांदा, ५ रुपये किलो कांदा... शेतकऱ्याची हुशारी, स्वतःच झाला व्यापारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 11:15 IST

कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.

तासगाव : शहरांमध्ये छोट्या मालगाड्यांमधून भाजीपाला, कांदा-बटाटे विकणारे शेतकरी किंवा त्यांच्याकडून गोळा करून विकणारा व्यापारी आपण बऱ्याचदा पाहतो. मात्र, कांद्याचे दर कमालीचे घरलेले असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे झाले आहेत. कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने रस्त्याशेजारी विकावा लागल्याचे चित्र सध्या तासगाव-सांगली रस्त्यावर दिसत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला प्रती किलो 2-3 रुपयांचा दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांचे आणि व्यापाऱ्यांचे फावले आहे. बाजारात सध्या 20 रुपयांच्या दराने कांदा ग्राहकांना विकला जात आहे. मात्र, शेतकऱ्य़ांना 2 ते 3 रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे अडत्यांच्या कात्रीत पिचलेला शेतकरी अगतिकपणे मिळेल त्या दराने कांदा विकू लागला आहे. यासाठी एखादा ट्रक भाड्याने घेऊन राज्य महामार्ग, गावोगावी जात रस्त्याशेजारीच पाच रुपये किलोने कांदा विकत आहे. 

याचा फायदा मात्र ग्राहकांना होत आहे. बाजारात 20 रुपये मोजण्यापेक्षा या शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने या मालगाड्यांजवळ झुंबड उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सीमाभागातील जमखंडीच्या शेतकऱ्याने कांदा कोल्हापूरच्या बाजारात विकण्यास आणला होता. मात्र, त्याला तेथे तीन रुपये दर सांगण्यात आला. सांगलीतही तोच दर सांगितला गेला. यामुळे या शेतकऱ्याने निराश होत रस्त्याशेजारीच ट्रक उभा करून अवघ्या 5 रुपये किलोने कांदा विकण्यास सुरुवात केली. यामुळे तेथील स्थानिकांमध्ये ही बातमी पसरताच काही वेळातच त्यांनी गर्दी करून गाड्या भरून कांद्याची पोती नेली. यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.

टॅग्स :onionकांदाKarnatakकर्नाटकSangliसांगली