शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

रक्तसाठा पुरेसा असला तरी गरजेनुसार शिबिरे घ्या, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 06:01 IST

शस्त्रक्रिया, प्रसुती, अपघातांवरील उपचारासाठी रक्ताची गरज सतत भासत असते. आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.

मुंबई : सध्या राज्यात ५५ हजार युनिट, तर मुंबईत १२ ते १३ हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध आहे. सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष आयाेजित करत असलेल्या रक्तदान शिबिरांमुळे समाधानकारक रक्तसाठा आहे. मात्र, रक्ताची गरज भासल्यास गरजेप्रमाणे शिबिरे घ्यावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.

शस्त्रक्रिया, प्रसुती, अपघातांवरील उपचारासाठी रक्ताची गरज सतत भासत असते. आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. लॉकडाऊनमुळे कोणीच शहराबाहेर गेले नसून, अपघातांचे प्रमाण कमी आहे. राज्य सरकारकडून केलेल्या आवाहनानंतर राज्यासह मुंबईकर नागरिकांनी रक्तदान शिबिरांना चांगला प्रतिसाद दिला. 

सध्या राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये ५५ हजार रक्त युनिट एवढा रक्तसाठा उपलब्ध असून, तो किमान जून महिन्यापर्यंत पुरेल इतकाच आहे. तर, मुंबईत १२ ते १३ हजार युनिट रक्तसाठा शिल्लक आहे. अजूनही बऱ्याचशा रक्तपेढ्या माहिती भरत नाहीत. रक्तसाठ्याचा आकडा वाढलेलाही असू शकतो, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले. सामाजिक संस्थांनी रक्त वाया जाणार नाही, याची काळजी घेत गरजेनुसार रक्तदान शिबिरांचे आयाेजन करावे, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले.

जून महिन्यापर्यंत पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक  - राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये ५५ हजार रक्त युनिट एवढा रक्तसाठा उपलब्ध असून, तो किमान जून महिन्यापर्यंत पुरेल इतकाच आहे.- आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. लॉकडाऊनमुळे कोणीच शहराबाहेर गेले नसून, अपघातांचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीMaharashtraमहाराष्ट्र