शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:21 IST

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांवर लाखो मावळे आजही जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे, हीच मावळे, जनता भाजपा-शिवसेना सरकारलाछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली. शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या अभ्यासक्रमातून गाळल्याच्या बातम्या आल्यानंतर मुंडेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून जगभरात महाराजांचा इतिहास माहिती आहे. संबंध जग महाराजांच्या शौर्यापुढे नतमस्तक होते, पण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा चौथीच्या पुस्तकातून वगळला आहे. वारंवार भाजपा-शिवसेनेचं सरकार एकीकडे महाराजांचं नाव घेतं आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांना अपमानित करतं. पण, महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न कराल तर, महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे, त्वरीत महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात सामावून घ्या, अन्यथा जनताच तुम्हाला याच मातीत गाडेल, असे धनंजय मुंडेंनी म्हटलंय. 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपतींचा इतिहास डावलला जात असल्याची टीका होत असतानाच राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचाइतिहास हद्दपार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात केली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकार बदलली मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. या प्रकारावर बोलण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी या सरकारला इशारा दिला आहे. 

छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरवाचेही उल्लंघन या सरकारने केले. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट आहे. राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपाला 21 तारखेला धडा शिकवल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEducation Sectorशिक्षण क्षेत्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार