शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दहावी, बारावीची परीक्षा जून किंवा त्यानंतरच घ्या!, ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:11 IST

exams : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले.

मुंबई : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्यावी, असे मत ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी मांडले.दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यात २,६०० हून अधिक शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले हाेते. सध्याच्या वाढत्या काेराेना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२.२ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी जूनमध्ये, तर ३३.१ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी जुलै महिन्यात परीक्षा घ्यावी, असे मत मांडले. एकूण ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी सध्या परीक्षा घेण्यास विराेध दर्शविला. २४.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेच त्याच नियोजनाप्रमाणे एप्रिल, मे महिन्यातच घ्याव्यात, असे मत मांडले. या सर्वेक्षणात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील, विशेषतः मुंबईतील सर्वाधिक शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला.यात राज्यातील ४५.५ टक्के शिक्षकांनी, तर ४०.७ टक्के विद्यार्थ्यांनी मते मांडली. सर्वेक्षणात पालकांचा सहभाग ११.७ टक्के हाेता, तर इतर व्यावसायिक आणि अन्य आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या का, या प्रश्नावर ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी त्या पुढे ढकलाव्या, अशी मागणी केली आहे. ३०.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलू नयेत, असे मत सर्वेक्षणात नोंदविले.याशिवाय दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान होईल का, या प्रश्नावर ३८.१ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी नुकसान होईल, असे मत मांडले. तर तब्बल ६१.९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे मत नोंदविले. एकंदर सार्वजनिक आरोग्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच परीक्षा व्हाव्यात, अशी भूमिका शिक्षक परिषदेकडे मांडण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मतांचा आदर करून निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस देणे, विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करणे आणि परीक्षा केंद्रांवर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करून आवश्यक ती सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध केल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने यापूर्वी शासनाकडे केली आहे. परंतु सध्याची वाढती कोविड रुग्णसंख्या पाहता विद्यार्थ्यांच्या आराेग्याच्या दृष्टीने तसेच कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच भूमिका आमची आहे.- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस