शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दहावी, बारावीची परीक्षा जून किंवा त्यानंतरच घ्या!, ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:11 IST

exams : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले.

मुंबई : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्यावी, असे मत ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी मांडले.दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यात २,६०० हून अधिक शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले हाेते. सध्याच्या वाढत्या काेराेना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२.२ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी जूनमध्ये, तर ३३.१ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी जुलै महिन्यात परीक्षा घ्यावी, असे मत मांडले. एकूण ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी सध्या परीक्षा घेण्यास विराेध दर्शविला. २४.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेच त्याच नियोजनाप्रमाणे एप्रिल, मे महिन्यातच घ्याव्यात, असे मत मांडले. या सर्वेक्षणात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील, विशेषतः मुंबईतील सर्वाधिक शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला.यात राज्यातील ४५.५ टक्के शिक्षकांनी, तर ४०.७ टक्के विद्यार्थ्यांनी मते मांडली. सर्वेक्षणात पालकांचा सहभाग ११.७ टक्के हाेता, तर इतर व्यावसायिक आणि अन्य आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या का, या प्रश्नावर ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी त्या पुढे ढकलाव्या, अशी मागणी केली आहे. ३०.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलू नयेत, असे मत सर्वेक्षणात नोंदविले.याशिवाय दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान होईल का, या प्रश्नावर ३८.१ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी नुकसान होईल, असे मत मांडले. तर तब्बल ६१.९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे मत नोंदविले. एकंदर सार्वजनिक आरोग्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच परीक्षा व्हाव्यात, अशी भूमिका शिक्षक परिषदेकडे मांडण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मतांचा आदर करून निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस देणे, विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करणे आणि परीक्षा केंद्रांवर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करून आवश्यक ती सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध केल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने यापूर्वी शासनाकडे केली आहे. परंतु सध्याची वाढती कोविड रुग्णसंख्या पाहता विद्यार्थ्यांच्या आराेग्याच्या दृष्टीने तसेच कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच भूमिका आमची आहे.- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस