शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना...चिमुकलीची सुप्रिया सुळेंना आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 15:57 IST

ताई , आमचे पप्पा खूप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण...

रावेर ( जळगाव ) दि 20 - ताई , आमचे पप्पा खूप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण आमच्या केळीला भाव मिळवून द्या, अशी आर्त हाक चौथीत शिकणार्‍या राजश्री देवानंद पाटील या चिमुकलीने आज  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करत आपल्या शेतातील केळी सुप्रिया सुळेंना भेट दिली.

राजश्रीची विनंती ऐकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केळीला भाव मिळवून देण्यासाठीच आम्ही ही हल्लाबोल यात्रा काढली असल्याची तिची समजूत घातली.  तसेच आमचे नेते विधीमंडळात याबाबतीत आवाज उचलतील असे आश्वासन दिले. त्या मुलीने दिलेली केळी सुप्रिया सुळे , धनंजय मुंडे व इतर नेत्यांनी खाऊन मुलीची समजूत काढत तिच्या पालकांना धीर देत पुढे मार्गक्रमण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगाव हून रावेर साठी निघाले होते. वाटते निंबोरा या गावात देवानंद पाटील यांची केळीची बागेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.  यावेळी शेतकरी देवानंद पाटील म्हणाले की, "सध्या केळीला ७०० प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात १००० ते १२०० भाव मिळत होता. करपा रोगाने यंदा केळीचे मोठे नुकसान केले असून त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पिक विमा मिळायलाही अडचण येत आहे. त्यातच वीज बिल भरमसाठ आल्यामुळे ते भरले जात नाहीत. कर्जमाफी तर दुरच राहिली." 

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस