शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार उपचार करावेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:41 IST

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने घेतली बैठक

मुंबई : राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर 24 तासात ताप कमी न झाल्यास तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात याव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आज केले.

गेल्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे, नाशिक विभागात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. राज्यात व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांवर नेमके काय उपचार करावे याबाबत आरोग्य विभागाकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी प्रोटकॉल तयार करण्यात येत आहे. त्याचा अवलंब खासगी व्यावसायिकांनी करावा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, आदी साथीच्या आजारांचा आढावा घेतला. राज्यात सध्या 892 स्वाईन फ्लू चे रुग्ण आहेत. 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक व पुणे विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. 1 जानेवारी ते 25 सप्टेंबर या कालावधीत 15 लाख 61 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 23 हजार 905 संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत. 892 बाधित रुग्णांपैकी रुग्णालयात 337 रुग्णांवर उपचार सुरु असून 463 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रात 44 तर नागपूर येथे तीन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. राज्यात नाशिक विभागात 26, पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 18, अहमदनगर 8, पुणे मनपा क्षेत्रात 7, सातारा व ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी 6, सोलापूर 3, अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव प्रत्येकी 2, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, बुलढाणा आणि मीर भाईंदर येथे प्रत्येकी एक अशा एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर राज्यातील एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव मधल्या वयोगटातील व्यक्तींना जाणवत आहे. स्वाईन फ्लूचा व्हायरसमध्ये बदल झाला नसून त्यावरील उपचारात होत असलेल्या विलंबामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचा निष्कर्ष डेथ ऑडिट समितीने काढला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या भागात ऑसेलटॅमीवीर गोळ्याची उपलब्धता सर्व औषध दुकानांमध्ये व्हावी तसेच या दुकानांमधून किती प्रमाणावर या गोळ्यांची विक्री झाली या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने अहवाल देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

राज्यातील खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी सर्दी, तापाच्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर एका दिवसात लक्षणे कमी झाली नाहीत तर अशा रुग्णांवर तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळी देण्यात यावी. यामध्ये कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. राज्यातील सर्वच मेडीकल स्टेअर्समध्ये ऑसेलटॅमीवीरच्या गोळ्यांची उपलब्धता असण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वाईन फ्ल्यूच्या ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्या त्या महापालिका क्षेत्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे. या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महापालिका आयुक्तांनी आठवड्यातून एकदा आढावा बैठक घ्यावी, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात 1 लाख 28 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्य