शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार उपचार करावेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:41 IST

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने घेतली बैठक

मुंबई : राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर 24 तासात ताप कमी न झाल्यास तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात याव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आज केले.

गेल्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे, नाशिक विभागात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. राज्यात व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांवर नेमके काय उपचार करावे याबाबत आरोग्य विभागाकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी प्रोटकॉल तयार करण्यात येत आहे. त्याचा अवलंब खासगी व्यावसायिकांनी करावा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, आदी साथीच्या आजारांचा आढावा घेतला. राज्यात सध्या 892 स्वाईन फ्लू चे रुग्ण आहेत. 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक व पुणे विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. 1 जानेवारी ते 25 सप्टेंबर या कालावधीत 15 लाख 61 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 23 हजार 905 संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत. 892 बाधित रुग्णांपैकी रुग्णालयात 337 रुग्णांवर उपचार सुरु असून 463 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रात 44 तर नागपूर येथे तीन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. राज्यात नाशिक विभागात 26, पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 18, अहमदनगर 8, पुणे मनपा क्षेत्रात 7, सातारा व ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी 6, सोलापूर 3, अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव प्रत्येकी 2, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, बुलढाणा आणि मीर भाईंदर येथे प्रत्येकी एक अशा एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर राज्यातील एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव मधल्या वयोगटातील व्यक्तींना जाणवत आहे. स्वाईन फ्लूचा व्हायरसमध्ये बदल झाला नसून त्यावरील उपचारात होत असलेल्या विलंबामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचा निष्कर्ष डेथ ऑडिट समितीने काढला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या भागात ऑसेलटॅमीवीर गोळ्याची उपलब्धता सर्व औषध दुकानांमध्ये व्हावी तसेच या दुकानांमधून किती प्रमाणावर या गोळ्यांची विक्री झाली या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने अहवाल देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

राज्यातील खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी सर्दी, तापाच्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर एका दिवसात लक्षणे कमी झाली नाहीत तर अशा रुग्णांवर तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळी देण्यात यावी. यामध्ये कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. राज्यातील सर्वच मेडीकल स्टेअर्समध्ये ऑसेलटॅमीवीरच्या गोळ्यांची उपलब्धता असण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वाईन फ्ल्यूच्या ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्या त्या महापालिका क्षेत्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे. या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महापालिका आयुक्तांनी आठवड्यातून एकदा आढावा बैठक घ्यावी, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात 1 लाख 28 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्य