शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 2:43 AM

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे.

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, जानेवारी ते मे या काळात १ हजार ५९२ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत राज्यभरात १७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, थंड हवामान असलेल्या नागपूर आणि नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे. 

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे. सरकारी यंत्रणेकडून स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. यंदा राज्यभरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांना पोषक वातावरण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, पुणे, नागपूर व अहमदनगरमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे स्वाइनची प्राथमिक लक्षणे सर्दी, खोकला, धाप लागणे, दोन-तीन दिवस ताप राहणे, घसा खवखवणे असे दिसताच तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत स्वाइन फ्लू लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसºया व तिसºया तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºया व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये १ लाख १ हजार ३५६ जणांना ही लस देण्यात आली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर ४२,४९२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. १ जानेवारी ते ३० जून २०१८ अखेर १,२८,०२६ व्यक्तींना लसीकरण देण्यात आले आहे. यंदा १ जानेवारी ते २६ मे २०१९ या कालावधीत २ हजार ९९० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लू