शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यभरात स्वाइन फ्लूचे १५६ बळी; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 05:15 IST

राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे.

मुंबई : राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे. तर पुणे मनपा क्षेत्रातील पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याखेरीज, सध्या राज्यभरात १६७ रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे मनपा आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान १० लाख ५८ हजार ३४१ रुग्णांना तपासण्यात आले आहे. तर १८ हजार ७८८ संशयित फ्लू रुग्णांना आॅसेलटॅमिवीरच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, या काळात १ हजार २०७ रुग्णांना रुग्णालयांत उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. २०१८ साली राज्यात स्वाइन फ्लूमुळे ४६१ रुग्णांचा बळी गेला होता, तर २ हजार ५९३ रुग्ण आढळून आले होते, तर २०१७ मध्ये ७७८ मृत्यूंची नोंद झाली होती आणि ६ हजार १४४ बाधित रुग्णांची संख्या दिसून आली होती.आरोग्य विभागाच्या वतीने स्वाइन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. याशिवाय विनाविलंब उपचार, विलगीकरण कक्ष, प्रतिबंधक लसीकरण, साथरोग प्रतिबंध व नियंत्रक समितीची स्थापना करणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

राजस्थानात सर्वाधिक मृत्यूराज्यासह देशातही स्वाइनची दहशत असून राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक म्हणजे २०१ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ९९९ इतके बाधित रुग्ण असल्याची नोंद आहे. राजस्थानच्या खालोखाल गुजरातमध्येही स्वाइनची दहशत कायम आहे. गुजरातमध्ये १५० रुग्णांचा बळी गेला असून ४ हजार ७६५ स्वाइनचे रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMaharashtraमहाराष्ट्र