शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सणामध्ये टपाल विभाग आणणार भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा, रक्षाबंधनासाठी विशेष नियोजन; राज्यभरात पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:31 IST

Post Office : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील टपाल कार्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राख्यांच्या जलद हाताळणीसाठी ‘राखी बाय स्पीडपोस्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

- सुहास शेलार

मुंबई : भावा-बहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. एकमेकांपासून दूर असलेली भावंडे यादिवशी आवर्जून भेटतात, पण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट असल्याने, त्यात खंड पडू न देण्यासाठी टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. दरवर्षी लाखो बहिणींनी त्यांच्या लाडक्या भाऊरायासाठी पाठविलेल्या राख्या वेळेत पोहोचविण्याचे काम पोस्टामार्फत केले जाते. कोरोनाच्या काळात माणसांच्या मुक्त संचारावर निर्बंध आल्याने ही संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यभरात विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सर्कलच्या मेल विभागाचे सहायक संचालक मनोज साळवे यांनी दिली.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील टपाल कार्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राख्यांच्या जलद हाताळणीसाठी ‘राखी बाय स्पीडपोस्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भावा-बहिणीच्या नात्यात आणखी गोडवा आणण्यासाठी रंगीबेरंगी पाकिटांसह, वॉटरप्रूफ आणि टेम्परप्रूफ कव्हर्स सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याशिवाय लोकजागृतीसाठी बॅनर, पोस्टर, स्टँडी जागोजागी लावण्यात आल्या आहेत. दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून जिंगल्सद्वारेही माहिती पोहोचविली जात आहे.

कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये राख्या खोळंबून राहू नयेत, यासाठी परिचलन व्यवस्था उभारण्यात आली आहेत. महत्त्वाच्या टपाल कार्यालयांत राख्यांसाठी विशेष खिडक्या राखून ठेवल्या आहेत, शिवाय राख्यांची पाकिटे अलग करण्याचा वेळ वाचविण्यासाठी वेगळ्या बॅग्ज देण्यात आल्या आहेत. राख्या वेळेत पोहोचविण्यासाठी कटऑफ तारीख ठरविण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यासाठी १७ ऑगस्ट आणि परराज्यांत राख्या पाठविण्यासाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत राखी आमच्यापर्यंत पोहोचल्यास कोणत्याही अडथळ्यांविना रक्षाबंधनाच्या आधी ती संबंधितांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती साळवे यांनी आली.

तत्काळ राख्या पोहोचविण्यासाठी यंत्रणागेल्या वर्षी महाराष्ट्र सर्कलकडे १ कोटी २१ लाख राख्या आल्या होत्या. त्यानुसार, यंदाचे नियोजन करण्यात आले आहे.तत्काळ राख्या पोहोचविण्यासाठी विशेष वितरण व्यवस्था, राखी मेलसारखी सुविधा प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यासाठी विशेष टीम तयार केली आहे.nकोरोनाच्या काळातील निर्बंधांमुळे काही सोसायट्यांच्या आवारात प्रवेश देण्यास मनाई करीत असल्यामुळे काही अडचणी जाणवत असल्याचेही साळवे यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी किती राख्या पोहोचविल्या - १ कोटी २१ लाखराज्यातील पोस्ट कर्मचारी - ३८ हजारराज्यातील पोस्ट कार्यालये -  ३००रक्षाबंधन कधी- रविवार, २२ ऑगस्ट

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaksha Bandhanरक्षाबंधन