शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

स्वरराज छोटा गंधर्व जयंती निमित्त : कोण तुजसम सांग मज गुरुराया..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 11:35 IST

संगीत रंगभूमीवर चार गंधर्व स्वर्गलोकांतून अवतरले...

बालगंधर्व, कुमार गंधर्व, सवाई गंधर्व आणि छोटा गंधर्व यांनी आपलं संगीत प्रसादाच्या रूपाने शिष्यांना वाटून पुन्हा एकदा स्वर्गलोकी विराजमान झाले. त्यातील एक गंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व यांची १० मार्चला जयंती.

अनुराधा राजहंस - 

स्वरराज छोटा गंधर्व यांचे मूळचे नाव श्री. सौदागर नागनाथ गोरे. १० मार्च १९१८ रोजी कोरेगावजवळच्या भाडळेगावी त्यांचा जन्म झाला. बालमोहन संगीत मंडळाचे संस्थापक दामूअण्णा जोशींनी छोटा गंधर्वांचे गाणे ऐकले आणि आपल्या बालनाट्यातून भूमिका करण्यासाठी ते त्यांना आपल्यासोबत घेऊन आले. २२ जुलै १९२८ म्हणजे वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली. ‘प्राणप्रतिष्ठा’ हे त्यांचं पहिलं नाटक! याशिवाय स्वर्गावर स्वारी, कर्दनकाळ, संशयकल्लोळ इ. अनेक नाटकांतून त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. श्री. बागलकोटकर, श्री. बळवंतराव गोवित्रीकर, श्री. पाध्ये इ. गुरूंकडे त्यांनी संगीताचे शिक्षण पूर्ण कले. आचार्य अत्र्यांच्या ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील त्रिपदी ही त्यांची शेवटची स्त्रीभूमिका.यानंतर आचार्य अत्र्यांच्या भ्रमाचा भोपळा, उद्याचा संसार, लग्नाची बेडी इ. अनेक नाटकांतून त्यांनी पुरुष भूमिका केल्या, तर १९५० नंतर छोटा गंधर्वांनी सौभद्र, मानापमान, विद्याहरण या प्रमुख संगीत नाटकांतून भूमिका केल्या. संगीत सौभद्रमधील कृष्णांनी तर रसिकांच्या मनात, हृदयात स्थान मिळवलं. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सन्मानाने ‘बालकिन्नर’ ही पदवी बहाल केली.६० व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. यावेळी बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले होते, ‘गाणे, मग ते नाटकातले असो, की बैठकीतले ते गोडच असायला हवे. जे गोड नाही ते गाणं नाही. मुखाशी आणि कानाशी ज्या गोष्टींचा संबंध येतो, त्या गोडच असायला हव्यात.’‘सौदागर’ हे खरं म्हणजे ज्योतिषाचं दुसरं नाव आहे. वस्त्रे विणणाºया घरात जन्मलेल्या या कलावंताने संगीताचे सूर असे मुलायम विणले, की त्याचे वस्त्र आभाळाला गवसणी घालणारे ठरले.छोटा गंधर्वांच्या षष्ट्यब्दी समारंभाच्या वेळी त्यांच्या मानपत्राचे शब्दांकन ना. सी. फडके यांनी केलं होतं. त्यात त्यांनी ‘आपल्या सुरेल, खणखणीत, मधुर आणि स्वरसाजांनी नटलेल्या गायकीने आपण रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे,’ असं म्हटलं आहे.असं सांगतात, की संगीत सुवर्णतुला या नाटकातील पदांच्या चाली एका दिवसात स्वरराजांनी दिल्या होत्या. ते केवळ गायक, संगीतकार होते असं नाही तर ते उत्तम कवीही होते. त्यामुळेच आजही ते आपली पदे, काव्य, अभिनय इ.द्वारे रसिकांच्या मनात घर करून आहेत. म्हणूनच त्यांच्याबद्दल बोलायचे तर, ‘स्वरराज, म्हणजे सुरांचे सच्चे, लयीला पक्के आणि रंजकतेचे सदैव भान असणारे’ असे हे कलाकार.असे गंधर्व भूतलावर येणे म्हणजे ‘परमेशाच्या ऐशा लीलाच’ आहेत. बालगंधर्वांनंतर संगीत रंगभूमीला लागलेली उतरती कळा घालवून पुन्हा एकदा संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे, असे हे स्वरराज म्हणजे खरोखरच ‘देव माणूस.’स्वरराजांसारख्या स्वत:ची मुद्रा उमटवलेल्या चिरंजीव स्वरांची निर्मिती करणाऱ्या कलावंताची फक्त जयंतीच साजरी करावी. कारण मृत्यू आला तो स्वरराज छोटा गंधर्वांच्या पार्थिव देहाला. पण त्यांचे अपार्थिव स्वर मात्र अमर आहेत.बालगंधर्वांना तर कायम त्यांनी गुरुस्थानी मानलं. ‘कोण तुजसम सांग मज गुरुराया’ अशाच प्रकारच्या भावना त्यांच्या मनात होत्या. पण आज सर्व रसिकांच्या मनात मात्र संगीत रंगभूमी पुन्हा बहरून आणणाऱ्या या कलाकाराविषयी ‘कोण तुजसम?’ अशाच प्रकारच्या भावना आहेत.आज स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे वास्तव्य असलेल्या प्रभात रोडच्या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले. महानगरपालिकेने वाहिलेली अशी ही या महान गायकाला ‘श्रद्धांजली.’

टॅग्स :Puneपुणेartकलाmusicसंगीत