शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

"अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं"; सुषमा अंधारेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 10:44 IST

महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा लढल्याबद्दल आभार अशी टीका अजित पवारांवर करण्यात आलीय.

Sushma Andhare Slam Ajit Pawar: दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला असून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने हा दिलासा दिला आहे. २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्तांप्रकरणी शुक्रवारी अजित पवारांना क्लिनचिट मिळाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोप फेटाळले. दुसरीकडे, ठाकरे गटाने अजित पवारांना मिळालेल्या दिलाश्यावरुन खोचक टोला लगावला आहे.  महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा लढल्याबद्दल आभार अशी टीका अजित पवारांवर करण्यात आलीय.

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला. २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्याच्या सर्व मालमत्ता शुक्रवारी मंजूर करण्यात आल्या. अजित पवारांविरोधातील सर्व दावे दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने फेटाळून लावले आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी अजितदादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

"कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेच त्यांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे. हा लोकशाहीच्या बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्याआधी सुद्धा राहुल कणाल, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, भावना गवळी या काही चित्र विचित्र लोकांनी मोठ्या ताकदीने दिला. या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भाजपचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा," असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते ज्यात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी मालकीच्या काही मालमत्तेचा कथित संबंध असलेली काही कागदपत्रे सापडली होती. मात्र, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत न्यायाधिकरणाने हे दावे फेटाळून लावले. अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा आणि मुलगा पार्थ अजित पवार यांची बाजू मांडणारे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायाधिकरणासमोर युक्तिवाद केला की, त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. ॲडव्होकेट पाटील यांनी बेनामी व्यवहार बंदी कायद्याच्या योजनेचा दाखला देत पवार कुटुंब निर्दोष असून त्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय कारवाईत खेचता येणार नाही, असे न्यायाधिकरणाला सांगितले. ५ नोव्हेंबर, २०२४ रोजी, न्यायाधिकरणाने प्राप्तिकर विभागाने दाखल केलेले अपील फेटाळून, पूर्वीचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी यापूर्वी जप्त केलेल्या  मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपाIncome Taxइन्कम टॅक्स