शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
4
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
5
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
6
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
7
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
8
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
9
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
11
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
12
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
13
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
14
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
16
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
17
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
18
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
19
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
20
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह

राज्यातील नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:24 IST

राज्यात सत्तासंघर्षाचे राजकरण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यात अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले असून, हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून राज्यातील विविध नवनिर्वाचित आमदार आप-आपल्या मतदारसंघात दौरे करताना पाहायला मिळत आहे. तर झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे मागणी सुद्धा या आमदारांकडून करण्यात आली आहे.

राज्यात सत्तासंघर्षाचे राजकरण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना पाहायला मिळत आहे.

ज्या भागात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. जवळपास त्या भागातील सर्वच आमदार शेतकऱ्याच्या मदतीला धावून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्ष पाहता सरकार स्थापनेपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. मात्र आमदारांच्या रेट्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनाम्याला सुरवात केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.