शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राज्यभरातील ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण, मागास प्रवर्ग आयोगाची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 06:09 IST

मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाने राज्यभरातील तब्बल ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण केले

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाने राज्यभरातील तब्बल ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण केले असून आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात मंगळवारी दिली. तर चार आठवड्यांत त्याबाबतचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.मराठा आरक्षणाबाबत आयोगाला जलदगतीने अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठापुढे झाली. आयोगाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने जनसुनावणी घेऊन आलेल्या लेखी तक्रारींची वर्गवारी करून विश्लेषण केले आहे, अशी माहिती ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयाला दिली.आयोगाने नियुक्त केलेल्या पाच एजन्सींनी ४५ हजार मराठा कुटुंबीयांचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दर्जाच्या निकषांवर नमुना सर्वेक्षण केले आहे. या एजन्सीकडून आलेल्या माहितीचेही विश्लेषण झाले आहे. विद्यापीठ व राज्य सरकारकडूनही मराठा समाजाच्या शैक्षणिक व सरकारी क्षेत्रातील रोजगारविषयी आयोगाला माहिती देण्यात आली आहे, असेही कदम यांनी न्यायालयाला सांगितले.>४ आठवड्यांत अहवाल द्यातज्ज्ञांचे मत, मौखिक व कागदोपत्री पुरावे, नमुना सर्वेक्षणाचा निष्कर्ष आणि कायदेशीर तरतुदींचा विचार करून मागास प्रवर्ग १५ नोव्हेंबरला राज्य सरकारपुढे अंतिम अहवाल सादर करेल, असे राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने सरकारला अहवाल चार आठवड्यांत सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण