शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

'सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री डील झालेली'; यामुळेच शिवसेना फुटली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 14:05 IST

शिवसेना फोडण्यामागे भाजपाचा हात आहे, हे आता सर्वश्रूत आहे. परंतू, वेगवेगळी त्याची वेगवेगळी कारणे दिली जात आहेत.

शिवसेनेचा आज वर्धापन दिन साजरा होणार आहे. यंदा पहिल्यांदाच दोन वेळा वर्धापन दिन होत आहे. शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवून टाकले होते. तसेच कायदेशीर लढाईत शिवसेना पक्ष, चिन्ह आपल्याकडे ठेवले होते. यामुळे राज्याचे पुढील राजकारण उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यावरच फिरत राहणार आहे. असे असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक वेगळाच दावा केला आहे. 

शिवसेना फोडण्यामागे भाजपाचा हात आहे, हे आता सर्वश्रूत आहे. परंतू, वेगवेगळी त्याची वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. ४० आमदार का बाजुला झाले, याची ही कारणे आहेत. त्यात आता आणखी एका दाव्याची भर पडली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ चा एक फॉर्म्युला तयार केला होता. त्यात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील असे ठरविण्यात आले होते. जेव्हा याची कुणकुण शिवसेनेच्या आमदारांना लागली तेव्हा त्यापैकी ४० आमदारांनी बंड पुकारले व मविआचे सरकार कोसळले असा दावा बावनकुळेंनी केला आहे. 

मविआमध्ये उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहतील अशी ही डील होती.  २०२४ च्या निवडणुकीनंतर सुप्रिया यांना मुख्यमंत्री केले जाणार होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांची संख्या देखील कमी होणार होती, असा दावा त्यांनी केला आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात बावनकुळेंनी हा दावा केला आहे. 

राष्ट्रवादीचे १०० आमदार निवडून येतील असे टार्गेट पवारांनी ठेवले होते. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते, तर अजित पवार काम करत असायचे. पवारांच्या याच टार्गेटमुळे शिवसेनेच्या आमदारांना पराभवाची चिंता सतावू लागली होती, याचे रुपांतर बंडात झाल्याचे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरेंचे सरकार असताना मला शिवसेनेचे आमदार किमान ५० वेळा तरी भेटले असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर आम्ही ६५ चे १० झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणायचे. पुढच्या वेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील, असा करार झाला आहे. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार असा करार होता. याच करारातून उद्धव यांनी आमदारांना गमावण्याचा निर्णय घेतल्याचे हे आमदार आपल्याला सांगायचे, असा दावा बावनकुळे यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाShiv Senaशिवसेना