शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर सुप्रिम कोर्टाचे कडक ताशेरे, नोंदवलं ठाकरे सरकारवरच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 19:23 IST

12 MLA Suspension : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळाप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केले होते.

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळाप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केले होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही ही कारवाई मागे घेण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकरणी भाजपाच्या १२ निलंबित आमदारांनी सुप्रिम कोर्टातही धाव घेतली होती. त्यामुळे या विषयावरून न्यायालयीन लढाईही सुरू झाली होती. दरम्यान, या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावरून राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहे.

१२ आमदारांच्या निलंबनप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात दिवसभर झालेल्या युक्तिवादात सुप्रीम कोर्टाने या कारवाईवर कडक ताशेरे ओढले आहेत. आमदारांचं निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय असला तरी ६० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी ते करता येणार नाही, असं कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हटलं आहे.

१२ आमदारांवर झालेली निलंबनाची कारवाई ही बरखास्तीपेक्षाही जास्त कडक ठरत असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईत कोर्ट सहसा ढवळाढवळ करत नाही. हा सभागृहाचा अधिकार असतो, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्यावतीने कोर्टात करण्यात आला. मात्र या कारवाईत केवळ आमदारांनाच नव्हे तर घटनात्मक मूल्यांनाही शिक्षा होत असल्याचे मत सुप्रीम कोर्टानं नोंदवत कडक टिप्पणी केली. आता भाजपच्या बारा निलंबित आमदारांच्या याचिकेवर पुढील सुनावणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत गोंधळ झाला होता. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनाता तालिका सभापती भास्कर जाधव यांच्यासोबत भाजपाच्या आमदारांचा वाद झाला होता. त्यानंतर तालिका सभापती  असलेल्या भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन केलं होतं. त्या आमदारांमध्ये आशिष शेलार,  अतुल भातखळकर, गिरीश महाजन, संजय कुटे, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, बंटी भांगडिया, हरिश पिंगळी यांचा समावेश होता. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाMLAआमदारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय