शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

सर्वोच्च न्यायालयाकडून फटकार; राज्यातील ६० प्रकल्पांना १०४ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:52 IST

घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था न केल्याने राज्यातील बांधकामांनाच बंदी करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण परिणामकारक राबविले आहे, असे अपील राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात केले होते.

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यातील ६० महापालिका, नगरपालिकांमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाने एकत्रित १०४ कोटी रुपये वितरित केले आहेत. यात विदर्भातील १८ नगरपालिकांचाही समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था न केल्याने राज्यातील बांधकामांनाच बंदी करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण परिणामकारक राबविले आहे, असे अपील राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात केले होते. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून राज्यातील अनेक महापालिकांनी बांधकाम परवानगी थांबविली होती. मात्र, असा कुठलाही आदेश काढला नसल्याने कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने परस्पर आदेश जारी करणे योग्य नसल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले होते. त्याअनुषंगाने राज्यातील ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य व केंद्र शासनाने १०४ कोटी रुपये देण्यास २७ सप्टेंबर रोजी हिरवी झेंडा दाखवला.

 यात केंद्राचे ६२.६८ कोटी रुपये, तर ४१.७९ कोटी रुपये राज्याचा हिस्सा आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने ६० शहरांचे ३५८.२२ कोटी रुपये किमतीचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर केले होते. त्यात केंद्र शासनाचा अनुज्ञेय हिस्सा १२५.३८ कोटी असून, त्यापैकी ६० टक्के अर्थात ६२.६८ कोटी रुपये राज्यास दिला आहे. केंद्र शासनाच्या या हिश्श्यासह राज्याने ४१.७९ कोटी रुपये स्वहिस्सा टाकत एकूण रक्कम ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याचे आदेश स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या राज्य संचालकांना दिले आहेत. 

 

या शहरांना मिळाला निधीकोल्हापूर, उल्हासनगर, लातूर, नांदेड, परभणी, आर्णी, दिग्रस, नेर, अकोट, बुलडाणा, चिखलदरा, दारव्हा, मेहकर, पातूर, शेगाव, तेल्हारा, उमरखेड, बीड, उस्मानाबाद, उदगीर, हिंगोली, परळी, पाथरी, मानवत, जालना, भूम, देगलूर, वैजापूर, नळदुर्ग, गंगाखेड, परतूर, पूर्णा, भोकरदन, परांडा, सेलू, मुरुम, राजापूर, पालघर, बल्लारपूर, भद्रावती, गडचिरोली, साकोली, कन्हान, वानाडोंगरी, नवापूर, राहुरी, वरणगाव, शहादा, जामखिंड, श्रीगोंदा, तळोदा, शेवगाव, इचलकरंजी, जुन्नर, अक्कलकोट, करमाळा,  शिरूर, आष्टा, तासगाव

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार