शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाकडून फटकार; राज्यातील ६० प्रकल्पांना १०४ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:52 IST

घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था न केल्याने राज्यातील बांधकामांनाच बंदी करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण परिणामकारक राबविले आहे, असे अपील राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात केले होते.

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यातील ६० महापालिका, नगरपालिकांमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाने एकत्रित १०४ कोटी रुपये वितरित केले आहेत. यात विदर्भातील १८ नगरपालिकांचाही समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था न केल्याने राज्यातील बांधकामांनाच बंदी करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण परिणामकारक राबविले आहे, असे अपील राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात केले होते. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून राज्यातील अनेक महापालिकांनी बांधकाम परवानगी थांबविली होती. मात्र, असा कुठलाही आदेश काढला नसल्याने कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने परस्पर आदेश जारी करणे योग्य नसल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले होते. त्याअनुषंगाने राज्यातील ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य व केंद्र शासनाने १०४ कोटी रुपये देण्यास २७ सप्टेंबर रोजी हिरवी झेंडा दाखवला.

 यात केंद्राचे ६२.६८ कोटी रुपये, तर ४१.७९ कोटी रुपये राज्याचा हिस्सा आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने ६० शहरांचे ३५८.२२ कोटी रुपये किमतीचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर केले होते. त्यात केंद्र शासनाचा अनुज्ञेय हिस्सा १२५.३८ कोटी असून, त्यापैकी ६० टक्के अर्थात ६२.६८ कोटी रुपये राज्यास दिला आहे. केंद्र शासनाच्या या हिश्श्यासह राज्याने ४१.७९ कोटी रुपये स्वहिस्सा टाकत एकूण रक्कम ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याचे आदेश स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या राज्य संचालकांना दिले आहेत. 

 

या शहरांना मिळाला निधीकोल्हापूर, उल्हासनगर, लातूर, नांदेड, परभणी, आर्णी, दिग्रस, नेर, अकोट, बुलडाणा, चिखलदरा, दारव्हा, मेहकर, पातूर, शेगाव, तेल्हारा, उमरखेड, बीड, उस्मानाबाद, उदगीर, हिंगोली, परळी, पाथरी, मानवत, जालना, भूम, देगलूर, वैजापूर, नळदुर्ग, गंगाखेड, परतूर, पूर्णा, भोकरदन, परांडा, सेलू, मुरुम, राजापूर, पालघर, बल्लारपूर, भद्रावती, गडचिरोली, साकोली, कन्हान, वानाडोंगरी, नवापूर, राहुरी, वरणगाव, शहादा, जामखिंड, श्रीगोंदा, तळोदा, शेवगाव, इचलकरंजी, जुन्नर, अक्कलकोट, करमाळा,  शिरूर, आष्टा, तासगाव

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार