शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

सुप्रीम कोर्टाने रचला इतिहास!

By admin | Updated: July 31, 2015 04:19 IST

याकूब मेमनला आणि त्याच्या वतीने इतरांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मागण्याची संधी देऊन न्यायसंस्थेने भारताचे नाव जगात उंचावले. हे करीत असताना सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : याकूब मेमनला आणि त्याच्या वतीने इतरांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मागण्याची संधी देऊन न्यायसंस्थेने भारताचे नाव जगात उंचावले. हे करीत असताना सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या वतीने करण्यात आलेल्या शेवटच्या याचिकेवर गुरुवारी पहाटे खुली सुनावणी घेऊन इतिहास रचला. सर्व न्यायालयीन प्रक्रिया संपल्याने फाशी आता अटळ आहे, असे म्हणत न्यायालयाने ही शेवटची याचिका गुरुवारी पहाटे ४.५० वाजता फेटाळली आणि त्यानंतर १०५ मिनिटांनी सकाळी ६.३५ ला याकूबला फासावर लटकविण्यात आले.‘डेथ वॉरंट’विरुद्ध याकूबने केलेली रिट याचिका न्या. दीपक मिश्रा, न्या. प्रफुल्ल चंद्र पंत आणि न्या. अतिताव रॉय यांच्या खंडपीठाने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फेटाळली तेव्हा एक शेवटची आशा म्हणून सर्वांचे डोळे राष्ट्रपती भवनाकडे लागले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज रात्री १०.४५ वाजता फेटाळला तेव्हा आता सर्व मार्ग खुंटले, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे व्हायचे नव्हते व याकूबच्या फाशीची अनिश्चितता त्यानंतरही सात तास आणखी ताणली जायची होती.केवळ याकूबलाच नव्हे तर मानवतावादी विचारातून कोणालाही फाशी होऊ नये असे वाटणारे प्रशांत भूषण व आनंद ग्रोव्हर हे ज्येष्ठ वकील सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. तेथे त्यांनी याकूबच्या फाशीविरुद्ध आम्ही याचिका घेऊन आलो आहोत, असे कळविले व त्यावर लगेच सुनावणी व्हावी, अशी त्यांनी विनंती केली. सरन्यायाधीशांना झोपेतून उठवून हा निरोप दिला गेला. त्यांनी लगेच सुनावणी घेण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ज्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे आधीच्या याचिकेची सुनावणी झाली होती त्याच खंडपीठाने या नव्या याचिकेवरही सुनावणी करावी, असे ठरले. यानुसार न्या. मिश्रा, न्या. पंत व न्या. रॉय यांना निरोप पाठविले गेले. न्या. वर्मा तिघांमध्ये ज्येष्ठ न्यायाधीश असल्याने त्यांच्या निवासस्थानी सुनावणी होईल या अपेक्षेने वकीलमंडळी मध्यरात्रीनंतर १ वाजता त्यांच्या घरी पोहोचली. न्या. पंत व न्या. रॉय हेही तेथे आले व तिघांनी विचार-विनिमय करून सुनावणी घरी न घेता सर्वोच्च न्यायालयात खुल्या पद्धतीने घेण्याचे ठरविले. अ‍ॅटर्नी जनरल रोहतगी यांना निरोप धाडला.न्यायाधीशांची सुरक्षा वाढविली याकूबची फाशी टाळण्यासाठी अगदी शेवटच्या दिवशी केल्या गेलेल्या याचिका ज्या तीन न्यायाधीशांनी फेटाळल्या त्यांच्या जिवाला धोका संभवू शकतो, अशी गुप्तवार्ता गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.कडेकोट कडीकुलुपात बंद असलेली सर्वोच्च न्यायालयाची इमारत उघडली गेली. सुनावणीसाठी क्र. ४ चे न्यायदालन सज्ज केले गेले. तिघेही न्यायाधीश उत्तररात्री २.३० च्या सुमारास न्यायालयात पोहोचले. रोहतगी यांच्या येण्याची प्रतीक्षा केली गेली आणि ते आल्यावर पहाटे ३.२० वाजता नीरव शांततेत ही ऐतिहासिक सुनावणी सुरू झाली. पुढील दीड तास झालेल्या युक्तिवादांमध्ये प्रशांत भूषण, आनंद ग्रोव्हर, युग चौधरी आणि वृंदा ग्रोव्हर या वकिलांनी याकूबची फाशी टाळावी, अशी कळकळीची विनंती केली. याकूबला मनाची तयारी करण्यासाठी, अल्लाची इबादत करण्यासाठी आणि ऐहिक सांसारिक बाबींची उस्तवार करण्यासाठी निदान १४ दिवसांचा तरी वेळ द्यावा, एवढाच त्यांचा किमान आग्रह होता. परंतु सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल रोहतगी यांनी सकाळपासूनचा ठाम विरोधाचा सूर कायम ठेवला. पुन्हा पुन्हा याचिका करून सर्वोच्च न्यायालयात येणे हा न्यायप्रक्रियेचा निव्वळ दुरुपयोग आहे. याकूबने केलेली याआधीची याचिका सायंकाळी ४.३० वाजता फेटाळली तेव्हाच त्याच्या फाशीच्या संदर्भातील सर्व न्यायिक प्रक्रिया संपली आहे. तरीही १४ दिवसांच्या अवधीसाठी आता पुन्हा याचिका केली गेली आहे. याला काही अंतच राहणार नाही. तरी न्यायालयाने यात अजिबात हस्तक्षेप करू नये, असे रोहतगी यांनी निक्षून सांगितले.