शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 6:24 AM

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले.

कोल्हापूर/सांगली/सातारा : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले. या भागातील पूरही ओसरू लागला असला तरी त्याची गती संथ आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यही वेगाने सुरू आहे. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, धान्य आणि भाज्यांची तीव्र टंचाई पूरग्रस्त भागात जाणवत आहे.ब्रह्मनाळ येथे गुरुवारी बोट बुडून जे वाहून गेले होते, त्यातील पाच जणांचे मृतदेह आज पूर ओसरू लागल्याने सापडले.कोल्हापूर, सांगलीत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. वांगी २०० रुपये किलो, पालेभाज्या १२५ ते १६० रुपये किलो, तर कोथिंबीर जुडी १०० रुपये भावाने विकली जात आहे. एटीएम बंद असल्याने खिशात रोकड नाही.शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील चौदापैकी दोन पंपांवर उपलब्ध असलेले पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर ते बंद करण्यात आले. प्रत्येक दुचाकीत जास्तीतजास्त शंभर रुपयांचे पेट्रोल दिले जात होते. पंपावर लांबच लांब रांगा होत्या. पाच तासांच्या वाटपानंतर चौदा पंपांवरील पेट्रोल संपले.कोल्हापूरात ८४ रुपये किलो असलेली तूरडाळ १२५ रुपये किलो, १०० रुपयांच्या आसपास असलेला मसूर २०० रुपये, तर मटकी १६० रुपयांनी विकली जात आहे. सांगली जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. भाज्या अभावानेच मिळत आहेत. राज्याला दूधपुरवठा करणाऱ्या या पट्ट्यातच दूध मिळेनासे झाले आहे. त्यामुळे काही दूध संघ, स्थानिक संस्था व व्यक्तींना मोफत दूधपुरवठा केला.क-हाड, पाटणचा महापूर ओसरलासातारा जिल्ह्यातील पाटणसह क-हाड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन्ही तालुक्यांतील पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने शनिवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे वक्री दरवाजे पाच फुटांवर आणण्यात आले. सध्या नदीपात्रात ४५ हजार २६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर आवक ५१ हजार २६७ क्युसेकने सुरू आहे. पाणीसाठा १०२.८६ टीएमसी आहे.सांगलीत पूर ओसरतोय इंचाइंचानेसांगलीत अद्यापही ६० टक्के भाग पाण्याखाली असून, नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. पूर इंचाइंचाने ओसरत आहे. कोल्हापूर व सांगलीतील पूर पूर्णत: ओसरण्यास आणखी किमान ७२ तास लागतील, अशी अपेक्षा असून, त्यानंतर जनजीवन सुरळीत होईल, मात्र त्यावेळी रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस पाऊ स पडता कामा नये.पूरग्रस्तांना पूर्वीपेक्षा अधिक भरपाई : मुख्यमंत्रीसांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीतील उपाययोजना करण्यासाठी १५९ कोटी रुपये आकस्मिक निधीतून देण्यात आले आहेत. आपत्तीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची, ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते म्हणाले की, अपंगत्व आल्यास पूर्वी ४३ हजार रुपये दिले जात, आता दोन लाख रुपये देण्यात येतील. उपचारासाठीसुद्धा आर्थिक मदत दिली जात आहे. घर पडले तर पूर्वी ६० हजार रुपये भरपाई होती, आता एक लाख भरपाई मिळेल.जनावरांची हानी झाल्यास ३० हजार, बैलासाठी २५ हजार रुपये, शेतीमधील गाळ काढण्यासाठी १३ हजार, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी ३८ हजार रुपयांची मदत केली जाईल. जेथे उद्योग, व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांच्याबाबतही मदतीचे धोरण स्वीकारले जाईल.शिरोळमध्ये पूरस्थिती गंभीरचशिरोळमधील १२ गावांना अजूनही पुराचा वेढा असून, त्यांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम् येथून नौदलाचे एक पथक १२ बोटींसह येथे दाखल झाले. तालुक्यात शनिवारी पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून अन्नाची तीन हजार पाकिटे पोहोचती करण्यात आली. 

टॅग्स :floodपूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर