शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सोयाबीन उत्पादक शेतक-यांना तळपत्या सूर्याची प्रतिक्षा

By admin | Updated: October 8, 2016 17:21 IST

यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतक-यांना रडकुंडीस आणले असून, ऐन काढणीवर आलेल्या सोयाबीनला परतीच्या पावसाने दणका दिला.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ८ -  यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतक-यांना रडकुंडीस आणले असून, ऐन काढणीवर आलेल्या सोयाबीनला परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पावसातच सोयाबीन काढले आहे. आता हे सोयाबीन वाचविण्यासाठी आणि सुकविण्यासाठी शेतक-यांची चांगलीच कसरत होत असल्याचे दिसते. चातक ज्याप्रमाणे आपली चोच वर करून पावसाच्या थेंबाची प्रतिक्षा करतो, त्याचप्रमाणे सोयाबीन शेतकरी वाटेल त्या मोकळ्या जागेवर सोयाबीन पसरवून सूर्य आकाशात दिसण्याची प्रतिक्षा करीत आहेत. 
 
मागील तीन वर्षांत सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अवषर्णाचा मोठा फटका बसला आणि या तीन वर्षांच्या कालावधित सोयाबीनचे उत्पादन जवळपास ६० टक्के घटले. काही शेतकºयांना, तर सोयाबीन काढणेही परवडले नाही. आता यंदा पावसाने सुरूवातीचे दोन महिने चांगली साथ दिल्याने मागील तिनही वर्षांची कसर पूर्ण होते की काय, असा विश्वास वाटू लागला होता; परंतु तो फोल ठरला. सोयाबीन शेंगा, फुलावर असताना पावसाने दडी मारल्यामुळे कित्येकांना आपले हिरवेगार सोयाबीन उन्हाच्या तडाख्यात सुकताना पाहूनही काहीच करता आले नाही. पश्चित व-हाडात यामुळे जवळपास ४० टक्के  सोयाबीन शेंगा धरण्यापूर्वीच सुकले, त्यानंतर पावसाने हजेरीइलावून पुन्हा एकदा उर्वरित सोयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवित केल्या. त्यामुळे सोयाबीन पुन्हा बहरले; परंतु हे पिक काढणीवर आले असतानाच परतीच्या पावसाने रेकॉड ब्रेक कामगिरी करतान १० दिवस ठाणच मांडले. यामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. काही शेतकºयांनी, तर रिमझीम पावसातच सोयाबीनची काढणी केली; परंतु काढलेले सोयाबीन आधीच ओलसर आणि त्यात वातावरणही पावसाळी. मग हे सोयाबीन पुन्हा खराब होण्याची भिती असल्याने शेतकरी अगदी घाणसाण जागेतही हे सोयाबीन पसरून सूर्य आकाशात तळपण्याची प्रतिक्षा करीत आहेत. हे सोयाबीन सुकावे म्हणून शेतकºयांची चिमुकली मुलेही पसरविलेले सोयाबीन वरचे खाली आणि खालचे वर करीत पित्याला मदत करीत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसले.