शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

विनाकारण धावत्या रेल्वेत चढणे आत्मघात, मयताच्या कुटुंबीयांना भरपाई नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 1:14 AM

आवश्यकता नसताना धावत्या रेल्वेत चढणे आत्मघात आहे. तसेच, ती कृती फौजदारी निष्काळजीमध्ये मोडते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदवून मयताच्या कुटुंबीयांना भरपाई नाकारली.

- राकेश घानोडे।

नागपूर : आवश्यकता नसताना धावत्या रेल्वेत चढणे आत्मघात आहे. तसेच, ती कृती फौजदारी निष्काळजीमध्ये मोडते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदवून मयताच्या कुटुंबीयांना भरपाई नाकारली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. नियम विसरून रेल्वे प्रवास करणाºया प्रवाशांचे डोळे उघडणारा हा निर्णय आहे.हॉकर गौतम कांबळे रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत होते. २१ जानेवारी २०१२ रोजी ते लातूर रोड रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेगाडीत चढताना खाली कोसळले व गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी)(२)मध्ये दुर्दैवी घटनांची व्याख्या देण्यात आली आहे. त्यात मोडणाºया घटनांमधील मयताच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनातर्फे भरपाई दिली जाते.उच्च न्यायालयाने कांबळेंची घटना या व्याख्येत मोडत नसल्याचे स्पष्ट केले. कांबळे रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्यासाठी कोणतीही गाडी महत्त्वाची नव्हती. त्यांना संबंधित धावत्या रेल्वेगाडीतच चढायचे होते तर, त्यांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. अन्यथा दुसºया रेल्वेगाडीची प्रतीक्षा करीत थांबायचे होते. त्याच एका रेल्वेगाडीत बसणे त्यांच्यासाठी गरजेचे नव्हते. त्यामुळे ही कृती सामान्य निष्काळजीमध्येमोडत नाही. त्यांची कृती फौजदारी निष्काळजीमध्ये मोडणारी व आत्मघातकी होती. अशा प्रकरणात मयताच्या कुटुंबीयांना भरपाईदिली जाऊ शकत नाही, असेउच्च न्यायालयाने निर्णय देताना नमूद केले.प्रथम अपील फेटाळलेकांबळेंची पत्नी व मुलाने १२ टक्के व्याजासह आठ लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी सुरुवातीला रेल्वे दावा न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. ती फेटाळली गेल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सखोल निर्णय देऊन प्रथम अपील फेटाळले व न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवला. कांबळेंकडे रेल्वे प्रवासाचे अधिकृत तिकीट होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

टॅग्स :Courtन्यायालय