शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 08:06 IST

जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना दिला.

गेवराई : गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव नामक शेतकऱ्याने त्याच्या शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या केली. हिंगणगाव येथील बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता, यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप जयभवानी कारखाना करणार होते, असे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नामदेवा घाई कशाला केलीस, दोन-चार दिवस थांबला असता तर सगळं काही बरं झालं असतं, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जयभवानी सहकारी साखर कारखान्याने आजवर ५ लाख ७२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे. कार्यक्षेत्रातील नोंदीच्या उसाबरोबरच बिगर नोंदीचा ऊसही गाळपाचे नियोजन कारखान्याने केले आहे. शेतकऱ्यांनी संयम राखणे गरजेचे असून, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही पंडित यांनी केले. जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना दिला.

नामदेवच्या उसाबद्दल काय म्हणाले चेअरमन

जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे १०१ हेक्टर ८० आर. क्षेत्रावरील उसाची नोंद जयभवानीकडे होती. नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप जयभवानीकडून करण्यात आले, तर बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता. यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप होणार होते. मागील वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याने त्यांच्या उसाचे गाळप केले होते. मात्र, यावर्षी गंगामाई शुगर्सने त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला नाही, असे ते म्हणाले.

१८ कारखान्यांनी गेवराईला वाऱ्यावर सोडले

१८ साखर कारखान्यांकडून दरवर्षी जयभवानीच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले जात होते. मात्र, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या कारखान्यांनी गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे अमरसिंह पंडित म्हणाले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या