शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 08:06 IST

जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना दिला.

गेवराई : गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव नामक शेतकऱ्याने त्याच्या शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या केली. हिंगणगाव येथील बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता, यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप जयभवानी कारखाना करणार होते, असे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नामदेवा घाई कशाला केलीस, दोन-चार दिवस थांबला असता तर सगळं काही बरं झालं असतं, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जयभवानी सहकारी साखर कारखान्याने आजवर ५ लाख ७२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे. कार्यक्षेत्रातील नोंदीच्या उसाबरोबरच बिगर नोंदीचा ऊसही गाळपाचे नियोजन कारखान्याने केले आहे. शेतकऱ्यांनी संयम राखणे गरजेचे असून, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही पंडित यांनी केले. जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना दिला.

नामदेवच्या उसाबद्दल काय म्हणाले चेअरमन

जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे १०१ हेक्टर ८० आर. क्षेत्रावरील उसाची नोंद जयभवानीकडे होती. नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप जयभवानीकडून करण्यात आले, तर बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता. यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप होणार होते. मागील वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याने त्यांच्या उसाचे गाळप केले होते. मात्र, यावर्षी गंगामाई शुगर्सने त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला नाही, असे ते म्हणाले.

१८ कारखान्यांनी गेवराईला वाऱ्यावर सोडले

१८ साखर कारखान्यांकडून दरवर्षी जयभवानीच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले जात होते. मात्र, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या कारखान्यांनी गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे अमरसिंह पंडित म्हणाले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या