शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
4
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
5
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
6
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
7
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
8
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
9
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
10
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
11
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
13
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
14
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
15
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
16
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
18
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
19
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
20
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात

देशातील साखर उत्पादनात ७१ लाख टनांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 07:00 IST

पुराचा फटका : राज्यातील साखर उत्पादनात ४५ लाख टनांनी होईल घट

ठळक मुद्दे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाजमराठवाडा आणि सोलापूरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले

पुणे : साखर उत्पादक राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती, गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने ऊस क्षेत्रात झालेली घट आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती या कारणांमुळे यंदा देशातील साखर उत्पादनामधे तब्बल ७१.६१ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील साखर उत्पादनात मोठी घट असून, महाराष्ट्रात तब्बल ४५ लाख टनांनी घट होईल. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने जुलै महिन्यात देशात २८२ लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. ऑक्टोबर महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे ऊस क्षेत्रात ४८.३१ लाख हेक्टरपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी (२०१८-१९) या हंगामामध्ये ५५.०२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात सुमारे ४० टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये आलेला पूर, अतिवृष्टी आणि गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊस क्षेत्र या मुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.  मराठवाडा आणि सोलापूरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. तसेच, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे राज्यात झालेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, २०२८-१९ या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यामुळे यंदा राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव व विजापूर जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र ५.०२ लाख हेक्टरवरुन ३.९९ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे येथील साखर उत्पादनात गत हंगामातील ४४.३० लाख टनांवरुन ३२ लाख टनापर्यंत घट होईल. या सर्व कारणांमुळे साखरेचे उत्पादन २६८.५ लाख टन होईल. यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीमुळे होणारी घट लक्षात घेतलेली नाही. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात आणखी साडेआठ लाख टनांची घट संभवते. म्हणजेच यंदा देशातील साखर उत्पादन २६० लाख टनांवर राहील. गेल्या हंगामात देशात ३३१.६१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. हा विचार केल्यास यंदा साखरेच्या उत्पादनात ७१.६१ लाख टनांची घट होईल. उत्तर प्रदेशात गेल्या हंगामात ११८.२१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामातही १२० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार