शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

साखर कारखानदारांनो साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:23 IST

साखर आयुक्तांचे आदेश; ९० कारखान्यांकडे अडकले ११७० कोटी, जप्त केलेली साखर विक्री होत नसल्याने राज्य शासनानेच दिली सवलत

ठळक मुद्देराज्यातील १९५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २३ हजार ८९ कोटी रुपये देणे कारखान्यांतील साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या सूचना सोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम घेतलेल्या ३१ पैकी ६ कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांचे पैसे दिले

सोलापूर: आरआरसी कारवाईनुसार जप्त केलेली साखरही लिलावात कोणी घेत नसल्याने आता साखर विक्री करून एफआरपीनुसार शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत शासनानेच साखर कारखान्यांना दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यातील ९० कारखान्यांंकडे ११७० कोटी रुपये इतकी रक्कम अडकली आहे.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणाºया कारखान्यांना नोटिसा देणे व आरआरसी कारवाईची प्रक्रिया करण्यास जानेवारीपासूनच सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी शेतकºयांचे पैसे दिले आहेत. साखर विक्री करून,इथेनॉलच्या पैशातून किंवा वीज विक्री करून शेतकºयांचे उसाचे पैसे देण्याची सवलत कारखानदारांना दिली होती. त्याप्रमाणे राज्यातील १०५ साखर कारखान्यांनी १५ जूनपर्यंत एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मे महिन्यात सुनावणी घेऊन एफआरपी देण्याची संधी दिल्यानंतरही शेतकºयांचे पैसे देण्यासाठी हयगय करणाºया राज्यातील ७७ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले आहेत.

सध्या ९० कारखान्यांकडे ११७० कोटी रुपये एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे आहे. आरआरसीच्या कारवाईनुसार साखर जप्त केली तरीही त्याची विक्री होत नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हीच साखर विक्री करा व एफआरपी चुकती करा अशा सूचना साखर कारखान्यांना साखर सहसंचालक कार्यालयातून सांगितल्या आहेत. जूनअखेरपर्यंत शेतकºयांचे पैसे द्या असे कारखानदारांना सांगितले जात आहे. आता कारखाना काय करणार?, याकडे लक्ष लागले आहे.

आरआरसीत अडकले ६२४ कोटी- आरआरसी केलेल्या ७७ कारखान्यांकडे ६२४ कोटी रुपये थकबाकीपोटी अडकले. - ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ६० इतकी आहे.- ६० ते ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या २२ इतकी आहे. - ५० टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ८ इतकी आहे. 

४८४ कोटी अडकलेसोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम घेतलेल्या ३१ पैकी ६ कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांचे पैसे दिले असून २५ कारखान्यांकडे ४८३ कोटी ६० लाख रुपये इतकी शेतकºयांची रक्कम अडकली आहे. यापैकी सिद्धनाथ कारखान्यांवर ३४ कोटी थकबाकीमुळे सव्वालाख क्विंटल साखर जप्तीची कारवाई केली आहे. 

राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २३ हजार ८९ कोटी रुपये देणे होते. त्यापैकी २१ हजार ९३२ कोटी रुपये शेतकºयांना दिले असून एफआरपीनुसार ५ टक्के रक्कम देणे आहे. कारखान्यांतील साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजना