शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

साखर कारखानदारांनो साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:23 IST

साखर आयुक्तांचे आदेश; ९० कारखान्यांकडे अडकले ११७० कोटी, जप्त केलेली साखर विक्री होत नसल्याने राज्य शासनानेच दिली सवलत

ठळक मुद्देराज्यातील १९५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २३ हजार ८९ कोटी रुपये देणे कारखान्यांतील साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या सूचना सोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम घेतलेल्या ३१ पैकी ६ कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांचे पैसे दिले

सोलापूर: आरआरसी कारवाईनुसार जप्त केलेली साखरही लिलावात कोणी घेत नसल्याने आता साखर विक्री करून एफआरपीनुसार शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत शासनानेच साखर कारखान्यांना दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यातील ९० कारखान्यांंकडे ११७० कोटी रुपये इतकी रक्कम अडकली आहे.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणाºया कारखान्यांना नोटिसा देणे व आरआरसी कारवाईची प्रक्रिया करण्यास जानेवारीपासूनच सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी शेतकºयांचे पैसे दिले आहेत. साखर विक्री करून,इथेनॉलच्या पैशातून किंवा वीज विक्री करून शेतकºयांचे उसाचे पैसे देण्याची सवलत कारखानदारांना दिली होती. त्याप्रमाणे राज्यातील १०५ साखर कारखान्यांनी १५ जूनपर्यंत एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मे महिन्यात सुनावणी घेऊन एफआरपी देण्याची संधी दिल्यानंतरही शेतकºयांचे पैसे देण्यासाठी हयगय करणाºया राज्यातील ७७ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले आहेत.

सध्या ९० कारखान्यांकडे ११७० कोटी रुपये एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे आहे. आरआरसीच्या कारवाईनुसार साखर जप्त केली तरीही त्याची विक्री होत नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हीच साखर विक्री करा व एफआरपी चुकती करा अशा सूचना साखर कारखान्यांना साखर सहसंचालक कार्यालयातून सांगितल्या आहेत. जूनअखेरपर्यंत शेतकºयांचे पैसे द्या असे कारखानदारांना सांगितले जात आहे. आता कारखाना काय करणार?, याकडे लक्ष लागले आहे.

आरआरसीत अडकले ६२४ कोटी- आरआरसी केलेल्या ७७ कारखान्यांकडे ६२४ कोटी रुपये थकबाकीपोटी अडकले. - ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ६० इतकी आहे.- ६० ते ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या २२ इतकी आहे. - ५० टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ८ इतकी आहे. 

४८४ कोटी अडकलेसोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम घेतलेल्या ३१ पैकी ६ कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांचे पैसे दिले असून २५ कारखान्यांकडे ४८३ कोटी ६० लाख रुपये इतकी शेतकºयांची रक्कम अडकली आहे. यापैकी सिद्धनाथ कारखान्यांवर ३४ कोटी थकबाकीमुळे सव्वालाख क्विंटल साखर जप्तीची कारवाई केली आहे. 

राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २३ हजार ८९ कोटी रुपये देणे होते. त्यापैकी २१ हजार ९३२ कोटी रुपये शेतकºयांना दिले असून एफआरपीनुसार ५ टक्के रक्कम देणे आहे. कारखान्यांतील साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजना