शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ते लोक धर्माधिकारींनी आणलेले हे मुनगंटीवारांचे वक्तव्य लांच्छनास्पद; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 20:26 IST

अजित पवार हे शरद पवारांना विचारूनच भाजपात जातील या रवी राणांच्या वक्तव्यावर राणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते कधी झाले हे आपल्याला माहिती नाही, असे उत्तर दिले.

नानासाहेब धर्माधिकारी यांना त्याच मैदानावर २००८ मध्येही महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला होता. यावेळपेक्षा अधिक लोक तेव्हा उपस्थित होते. कालचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात घेतला असता तर ही दुर्घटना टळली असती. जमलेले लोक हे धर्माधिकारींना आणल्याचे जे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले, ते लांच्छनास्पद आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

२००८ मध्ये कार्यक्रमाची व्यवस्था आम्ही पाहतो असे श्री संप्रदायाने सांगितले होते. त्यावेळी तो कार्यक्रम यापेक्षा भव्यदिव्य असा कार्यक्रम झाला होता. हे महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला माहित आहे. श्री सेवकांची गर्दी होणार हे सरकारला माहित होते. तेव्हा योग्य त्या पध्दतीने आयोजन करायला पाहिजे होते. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची मी निंदा करतो, असे पटोले म्हणाले. 

धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमाला जमलेले लोक त्यांनीच आणले होते, असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले आहे. अशाप्रकारे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीवर असे आरोप करणे चुकीचे आहे. हे लांच्छनास्पद वक्तव्य आहे. हा सरकारचा कार्यक्रम होता. यामुळे सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणीही पटोले यांनी केली. 

याचबरोबर अजित पवार हे शरद पवारांना विचारूनच भाजपात जातील या रवी राणांच्या वक्तव्यावर राणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते कधी झाले हे आपल्याला माहिती नाही, असे उत्तर दिले. तसेच ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, त्यावर बोलणे उचित होणार नाही, असेही पटोले म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस