शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात अचानक भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:05 IST

राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील वीज सकाळपासून गुल झाली होती.

रत्नागिरी/भुसावळ : राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील वीज सकाळपासून गुल झाली होती. काही ठिकाणी चार ते सव्वासहा तासांपर्यंत भारनियमन करण्याची नामुश्की महावितरणवर ओढविली. राज्यात १७ हजार ४७० मेगावॅट विजेची मागणी असून, १५ हजार ७३ मेगावॅट पुरवठा महावितरणकडून करण्यात होत आहे. २ हजार ३९७ मेगावॅटचा तुटवडा झाल्याने आकस्मिक भारनियमन करावे लागले. बी, सी, डी, ई, एफ, जी (१), जी (२), जी (३) गटातील फिडरवर सकाळपासून भारनियमन करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. भुसावळजवळील दीपनगर वीजनिर्मिती केंद्राला रोज सहा रॅक कोळशाची गरज असताना केवळ चार रॅक कोळसा मिळत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली. 

राज्यातून एकूण १७ हजार ४७० मेगावॅट विजेची मागणी होत असताना १५ हजार ७३ मेगावॅट विजेचा पुरवठा महावितरणकडून करण्यात येत आहे. २ हजार ३९७ मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत असल्यामुळे राज्यात आकस्मिक भारनियमन जाहीर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १४५ फिडरना भारनियमनाचा फटका बसला. रत्नागिरी जिल्'ातील फिडर्सचा समावेश ए ते डी ग्रुप मध्ये होतो. आकस्मिक भारनियमन झाल्यामुळे ग्राहकांची विजेअभावी गैरसोय झाली.महावितरणला उपलब्ध झालेली वीजमहानिर्मिती कंपनी-४,७०० मेगावॅटअदानी प्रकल्प- १७०० मेगावॅटरतन इंडिया कंपनी -५००केंद्रीय प्रकल्प -३,४००जिंदाल प्रकल्प -३००सीजीपीएल -५८०एम्को- १००पवन ऊर्जा -१०० ते २००उरण गॅस प्रकल्प -३८०कोयनासह जलविद्युत प्रकल्प -१००० ते १२००अल्पकालीन कराराद्वारे खरेदी- ७००गरज सहा रॅकची मिळतो चार रॅक कोळसाभुसावळ (जि. जळगाव) : दीपनगर येथील वीजनिर्मिती केंद्राला सध्या कमी कोळसा मिळत आहे. या वीजनिर्मिती केंद्राला सध्या रोज सहा रॅक कोळशाची गरज असता चार रॅक कोळसा मिळत असल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर. बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, दीपनगर वीज केंद्रात सध्या ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच कार्यान्वित आहेत. त्यातून ६०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. अशा परिस्थितीतही दीपनगर वीज केंद्राकडे ३७ हजार टन कोळशाचा साठा आहे.५०० मेगावॅटच्या दोन संचांसाठी रोज रेल्वेचे सहा रॅक भरून कोळसा लागतो. मात्र सध्या देशात व राज्यात कोळशाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणीपेक्षा कमी कोळसा मिळत आहे, ही स्थिती फार दिवस राहणार नाही. यात लवकरच बदल होऊन पुरेसा कोळसा मिळेल, असा दावा त्यांनी केला. एका रॅकमध्ये ३६ मे.टन कोळसा येतो. एका रॅकला ५९ डबे असतात. आपल्याला चार रेक मिळतो, असे त्यांनी सांगितले.मराठवाडा : औरंगाबाद, जालन्यात नऊ तासांपर्यंत भारनियमनऔरंगाबाद : विजेच्या तुटवड्याने महावितरणने बुधवारी तब्बल नऊ तासांपर्यंत लोडशेडिंग केल्याने परिमंडळातील औरंगाबाद आणि जालन्यातील नागरिकांना झटका बसला. परिमंडळातील ९५ टक्के म्हणजे २७७ फिडरची वीज गुल होती. यामध्ये औरंगाबादेतील ७३ फिडरवरील वसाहतींमध्ये सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाला.सप्टेंबरमध्ये सुरू झालेले भारनियमन नवरात्रीत कमी झाले होते. नागरिकांना थोडा दिलासा मिळत नाही तोच पुन्हा सुरू झाले. शहरातील विविध भागांत बुधवारी सकाळीच वीजपुरवठा बंद झाला. आॅक्टोबर हिटचा चांगलाच कडाका जाणवत आहे. त्यात भारनियमनामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद आणि जालन्यात २८७ फिडर आहेत. एकूूण ७ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत. औरंगाबाद शहरात ८३ फिडर असून, २ लाख ८२ हजार ग्राहक आहेत. औरंगाबाद आणि जालन्यातील २८७ फिडरपैकी केवळ १०, तर औरंगाबादेतील ८३ पैकी १० फिडरवर लोडशेडिंग झाले नाही. उर्वरित सर्व फिडरवर ९ तास १५ मिनिटांपर्यंत भारनियमन करण्यात आले.

अवघ्या २५ हजार ग्राहकांना दिलासाएका फिडरवर जवळपास अडीच हजार वीजग्राहक आहेत. शहरातील १० फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत राहिल्याने जवळपास २५ हजार ग्राहकांना दिलासा मिळाला; परंतु २ लाख ५७ हजार वीज ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसला.

दिवाळीत पुरवठा सुरळीतपाऊस चांगला पडल्याने शेतीचे पंप सुरू झाले आहेत. त्यामुळे विजेची तूट आहे. दिवाळीमध्ये उद्योग बंद असतात. त्यामुळे दिवाळीच्या तीन दिवसांत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. ज्याप्रमाणे मोबाइलचे बिल वेळेवर भरले जाते, त्याचप्रमाणे विजेचे बिलही वेळेवर भरले पाहिजे, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले.

विजेचा तुटवडा वाढला१६ आणि १७ सप्टेंबर आणि २९ आणि ३० सप्टेंबर असे ४ दिवस वगळता शहरात सुरू असलेल्या भारनियमनादरम्यान १०० मेगावॅट विजेचा तुटवडा होता. तो आता २५ ते ३० मेगावॅटने वाढला आहे. त्यामुळे महावितरणने बुधवारी सकाळी ११ वाजेनंतर सी आणि बी गटातील फिडरवरही भारनियमन केले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र