‘स्वाभिमान’चे सुभाष पाटील ठार
By Admin | Updated: July 21, 2014 03:40 IST2014-07-21T03:40:33+5:302014-07-21T03:40:33+5:30
नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष शंकर पाटील यांच्यासह आणखी एकाचा संगमेश्वरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर उक्षी-मानसकोंड येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला

‘स्वाभिमान’चे सुभाष पाटील ठार
देवरूख : नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष शंकर पाटील यांच्यासह आणखी एकाचा संगमेश्वरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर उक्षी-मानसकोंड येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. कणकवली (सिंधुदुर्ग) येथे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा स्नेहमेळावा आटोपून मुंबईकडे परतताना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काळाने त्यांच्यावर झडप घातली.
सुभाष पाटील (वय २८) व अश्विन नागेश पाटील (२७) हे दोघे जण फॉर्च्युनर गाडी घेऊन कणकवली येथे गेले होते. राणेंचा स्नेहमेळावा आटोपून मुंबईकडे परतताना ओव्हरटेक करताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरवर ही गाडी जाऊन आदळली. सुभाष व अश्विन पाटील यांचे या अपघातात जागीच निधन झाले. अपघातातील मृत सुभाष पाटील हे स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक तसेच ‘मनसे’चे सोलापूरचे माजी शहराध्यक्ष होते. (प्रतिनिधी)