शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 07:52 IST

आपल्या शिक्षणाच्या खर्चासाठी वडिलांची ओढाताण होते, या चिंतेतून ईश्वरवठार (ता. पंढरपूर) येथील अनिशा हनुमंत लवटे (17) हिने आत्महत्या केली.

सोलापूर - आपल्या शिक्षणाच्या खर्चासाठी वडिलांची ओढाताण होते, या चिंतेतून ईश्वरवठार (ता. पंढरपूर) येथील अनिशा हनुमंत लवटे (17) हिने आत्महत्या केली. हनुमंत काशिनाथ लवटे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. अनिशा ही पॉलिटेक्निकल कॉलेजला डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांची होणारी ओढाताण अनिशाला बघवत नव्हती. त्यातून घरी पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. आपण गेल्यावर आपली बहीण, भाऊ यांना वडील चांगले शिक्षण देतील, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत, असाही चिठ्ठीत उल्लेख आहे. 

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात हनुमंत लवटे यांचं कुटुंब एक एकर शेतीवर आपली उपजीविका भागवतं. सलग दोन वर्षांचा दुष्काळ आणि त्यानंतर झालेली गारपीट यामुळे त्यांच्या एक एकर शेतीतील द्राक्षाची बाग जाळून गेली. यामुळे घरावरील कर्ज वाढत चाललं होतं. शेतीच्या अशा बेभरवशी व्यवसायामुळे लवटे यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांची मोठी मुलगी सांगोल्यातील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर दुसरी अनिशा तासगाव येथे डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.

लहान मुलगा देखील वारणा येथे शिकायला ठेवल्याने कुटुंबावर खर्चाचा ताण वाढला होता.  शेतीत झालेलं नुकसान, त्यामुळे वाढलेलं कर्ज यातच या तीनही मुलांच्या शिक्षणामुळे वडिलांवरील कर्ज वाढत असल्याची भावना अनिशाची झाली होती. यातूनच तिच्या फीच्या रकमेची व्यवस्था न झाल्याने कॉलेजला जाणं लांबत चाललं होतं. वडिलांची परवड असह्य झाल्याने अखेर अनिशाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी तिने शिक्षणाचा खर्च वडिलांना पेलवत नसल्याने आत्महत्या करत असून यास कोणाला जबाबदार धरु नये अशी चिठ्ठी लिहून ठेवली.

गरीब शेतकऱ्यांना आता मुलांचं शिक्षण हीच गुंतवणूक वाटू लागली आहे. कर्ज काढून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अशा कुटुंबाची धडपड सुरु असते. मात्र आई-वडिलांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी झालेला हा त्रास असह्य झाल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना नैराश्य येतं. त्यामुळे सरकारी योजना आणि शिष्यवृत्ती यांसारख्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळाला तर अशा दुर्दैवी घटना होणार नाहीत.

टॅग्स :Suicideआत्महत्याPandharpurपंढरपूरFarmerशेतकरीCrimeगुन्हा