शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

अभिजातच्या लढ्याला एकीचे बळ : विधानसभेपूर्वी शिक्कामोर्तब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 07:00 IST

मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे. 

ठळक मुद्दे इतर भाषांच्या अभिजात दर्जासाठी एकत्रित लढ्याबाबत चर्चा

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळात पहिल्यांदाच केलेले भाष्य आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राज्यसभेत दिलेली हमी यामुळे अभिजात दर्जाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिजातच्या दर्जावर शिक्कामोर्तब होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी चार-पाच वर्षांपासून विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली ५५० पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. बडोदा येथील साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पत्रेही पाठवण्यात आली. अभिजातसह इतर मागण्यांसाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अभिजात दर्जाबाबत मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला ठोस आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांमध्येच विनोद तावडे यांनीही विधीमंडळात अभिजात दर्जाबाबत सकारात्मक भाष्य केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. शासन स्तरावरील या हालचाली पाहता विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठीच्या अभिजात दर्जावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाल्याचे साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.अभिजातच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. मिलिंद जोशी, राजन खान, संजय सोनवणी, प्रा. हरी नरके, डॉ. सदानंद मोरे, संजय नहार आदी मान्यवरांचा साहित्यिक गोतावळा नुकताच एकत्र जमला होता. एकट्याने लढलेली लढाई कायमच अवघड असते. याउलट एकीचे बळ कायमच वरचढ ठरते. त्यामुळे मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, अर्धमागधी, प्राकृत, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून दयायचा असेल तर यापुढे भाषा, प्रांत, प्रदेशाच्या सीमा ओलांडून सर्व साहित्यिकांनी एकत्र आले पाहिजे, यावर सर्वांचे एकमत झाले. डॉ. सदानंद मोरे यांनी या चळवळीचे नेतृत्व करावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली.........मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात आला आहे. आता महाराष्ट्राने नेतृत्व करुन इतर भाषांना अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबत चर्चा झाली. भाषांची चळवळ एकत्रितपणे लढली जावी, हाच सर्वांचा प्रयत्न असेल. प्रत्येकाने आपापला लढा लढल्यास तो एकाकी ठरतो. याउलट सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. काश्मीरी, आसामी, पाली, अर्धमागधी यांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक आहेत.- संजय सोनवणी, साहित्यिक..........मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत पहिल्यांदाच एवढी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन, भाषामंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांचे भाष्य ही सुसंगती लक्षात घेता विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिजातचा प्रश्न मार्गी लागेल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. अभिजातचा मुद्दा ५०० कोटी रुपयांपेक्षाही महाराष्ट्राचा अभिमानबिंदू म्हणून जास्त महत्वाचा आहे.- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस