शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अभिजातच्या लढ्याला एकीचे बळ : विधानसभेपूर्वी शिक्कामोर्तब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 07:00 IST

मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे. 

ठळक मुद्दे इतर भाषांच्या अभिजात दर्जासाठी एकत्रित लढ्याबाबत चर्चा

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळात पहिल्यांदाच केलेले भाष्य आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राज्यसभेत दिलेली हमी यामुळे अभिजात दर्जाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिजातच्या दर्जावर शिक्कामोर्तब होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी चार-पाच वर्षांपासून विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली ५५० पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. बडोदा येथील साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पत्रेही पाठवण्यात आली. अभिजातसह इतर मागण्यांसाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अभिजात दर्जाबाबत मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला ठोस आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांमध्येच विनोद तावडे यांनीही विधीमंडळात अभिजात दर्जाबाबत सकारात्मक भाष्य केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. शासन स्तरावरील या हालचाली पाहता विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठीच्या अभिजात दर्जावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाल्याचे साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.अभिजातच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. मिलिंद जोशी, राजन खान, संजय सोनवणी, प्रा. हरी नरके, डॉ. सदानंद मोरे, संजय नहार आदी मान्यवरांचा साहित्यिक गोतावळा नुकताच एकत्र जमला होता. एकट्याने लढलेली लढाई कायमच अवघड असते. याउलट एकीचे बळ कायमच वरचढ ठरते. त्यामुळे मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, अर्धमागधी, प्राकृत, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून दयायचा असेल तर यापुढे भाषा, प्रांत, प्रदेशाच्या सीमा ओलांडून सर्व साहित्यिकांनी एकत्र आले पाहिजे, यावर सर्वांचे एकमत झाले. डॉ. सदानंद मोरे यांनी या चळवळीचे नेतृत्व करावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली.........मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात आला आहे. आता महाराष्ट्राने नेतृत्व करुन इतर भाषांना अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबत चर्चा झाली. भाषांची चळवळ एकत्रितपणे लढली जावी, हाच सर्वांचा प्रयत्न असेल. प्रत्येकाने आपापला लढा लढल्यास तो एकाकी ठरतो. याउलट सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. काश्मीरी, आसामी, पाली, अर्धमागधी यांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक आहेत.- संजय सोनवणी, साहित्यिक..........मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत पहिल्यांदाच एवढी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन, भाषामंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांचे भाष्य ही सुसंगती लक्षात घेता विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिजातचा प्रश्न मार्गी लागेल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. अभिजातचा मुद्दा ५०० कोटी रुपयांपेक्षाही महाराष्ट्राचा अभिमानबिंदू म्हणून जास्त महत्वाचा आहे.- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस