शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:07 IST

महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे

नाशिक - कांद्याला भाव नाही म्हणून अनेकदा शेतकरी रडकुंडीला आल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे. परंतु याच शेतकऱ्यांच्या मदतीला आता तेलंगणा सरकार धावून आले आहे. नाशिकच्या लासलगाव इथं कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणाहून तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कांद्याची मोठ्या दराने खरेदी केली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना खुश करण्याची रणनीती आखली आहे. 

लासलगाव इथं कांद्याचे लिलाव झाल्यानंतर देशभरात कांद्याचे भाव ठरतात. महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे. शेतकऱ्यांकडून २ हजार रुपये दराने हा कांदा खरेदी केला जात आहे. लासलगाव बाजार समितीत ७००-९०० रुपये कांद्याला भाव मिळत होता. मात्र तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील विस्तारासाठी रणनीती आखली असून अबकी बार किसान सरकार हा नारा दिला आहे. 

त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांदा दरात आता मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी हात घातला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव कसा मिळेल यादृष्टीने बीआरएस पक्ष कामाला लागला आहे. परंतु मुख्यमंत्री राव यांच्या रणनीतीने राज्यातील भाजपा-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी जे कांदा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते त्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते, त्यांना बीआरएस पक्षाने शब्द दिला होता कांदा फेकू नका, आम्ही तो विकत घेऊ, हा शब्द खरा ठरलाय, जो कांदा फेकून देत होतो त्याला चढ्या दराने भाव मिळाला आहे. राज्यातील पुढारी नालायक आहेत. शेतकऱ्यांशी त्यांचे देणेघेणे नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखऱ राव यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अशी प्रतिक्रिया बीआरएस पक्षाचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. 

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीonionकांदाFarmerशेतकरीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव