शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:07 IST

महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे

नाशिक - कांद्याला भाव नाही म्हणून अनेकदा शेतकरी रडकुंडीला आल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे. परंतु याच शेतकऱ्यांच्या मदतीला आता तेलंगणा सरकार धावून आले आहे. नाशिकच्या लासलगाव इथं कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणाहून तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कांद्याची मोठ्या दराने खरेदी केली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना खुश करण्याची रणनीती आखली आहे. 

लासलगाव इथं कांद्याचे लिलाव झाल्यानंतर देशभरात कांद्याचे भाव ठरतात. महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे. शेतकऱ्यांकडून २ हजार रुपये दराने हा कांदा खरेदी केला जात आहे. लासलगाव बाजार समितीत ७००-९०० रुपये कांद्याला भाव मिळत होता. मात्र तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील विस्तारासाठी रणनीती आखली असून अबकी बार किसान सरकार हा नारा दिला आहे. 

त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांदा दरात आता मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी हात घातला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव कसा मिळेल यादृष्टीने बीआरएस पक्ष कामाला लागला आहे. परंतु मुख्यमंत्री राव यांच्या रणनीतीने राज्यातील भाजपा-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी जे कांदा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते त्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते, त्यांना बीआरएस पक्षाने शब्द दिला होता कांदा फेकू नका, आम्ही तो विकत घेऊ, हा शब्द खरा ठरलाय, जो कांदा फेकून देत होतो त्याला चढ्या दराने भाव मिळाला आहे. राज्यातील पुढारी नालायक आहेत. शेतकऱ्यांशी त्यांचे देणेघेणे नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखऱ राव यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अशी प्रतिक्रिया बीआरएस पक्षाचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. 

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीonionकांदाFarmerशेतकरीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव