शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:07 IST

महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे

नाशिक - कांद्याला भाव नाही म्हणून अनेकदा शेतकरी रडकुंडीला आल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे. परंतु याच शेतकऱ्यांच्या मदतीला आता तेलंगणा सरकार धावून आले आहे. नाशिकच्या लासलगाव इथं कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणाहून तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कांद्याची मोठ्या दराने खरेदी केली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना खुश करण्याची रणनीती आखली आहे. 

लासलगाव इथं कांद्याचे लिलाव झाल्यानंतर देशभरात कांद्याचे भाव ठरतात. महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे. शेतकऱ्यांकडून २ हजार रुपये दराने हा कांदा खरेदी केला जात आहे. लासलगाव बाजार समितीत ७००-९०० रुपये कांद्याला भाव मिळत होता. मात्र तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील विस्तारासाठी रणनीती आखली असून अबकी बार किसान सरकार हा नारा दिला आहे. 

त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांदा दरात आता मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी हात घातला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव कसा मिळेल यादृष्टीने बीआरएस पक्ष कामाला लागला आहे. परंतु मुख्यमंत्री राव यांच्या रणनीतीने राज्यातील भाजपा-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी जे कांदा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते त्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते, त्यांना बीआरएस पक्षाने शब्द दिला होता कांदा फेकू नका, आम्ही तो विकत घेऊ, हा शब्द खरा ठरलाय, जो कांदा फेकून देत होतो त्याला चढ्या दराने भाव मिळाला आहे. राज्यातील पुढारी नालायक आहेत. शेतकऱ्यांशी त्यांचे देणेघेणे नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखऱ राव यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अशी प्रतिक्रिया बीआरएस पक्षाचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. 

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीonionकांदाFarmerशेतकरीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव