शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

खोट्या तक्रारी मागे न घेतल्यास जैन समाजाचे राज्यभर आंदोलन, दीक्षार्थींच्या फलक वादप्रकरणी इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 01:54 IST

Jalgaon : अमळनेर येथील नवयुवक विनय बागरेचा (१६) हा जैन दीक्षा घेत आहे. याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते.

अमळनेर (जि. जळगाव) :  जैन दीक्षार्थीच्या सन्मानार्थ लावलेले फलक हटविणारे अमळनेर पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी जैन समाजातील युवकांवर दाखल केलेल्या खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात; अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे. या मुजोर अधिकाऱ्यास बडतर्फ करण्याची मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.अमळनेर येथील नवयुवक विनय बागरेचा (१६) हा जैन दीक्षा घेत आहे. याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते. गत मंगळवारी रात्री उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी ते फलक काढून टाकले, तसेच यावेळी तिथे आलेल्या जैन समाजातील लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. समाजाच्या भावना दुखावल्याने गायकवाड यांच्याविरोधात युवकांनी तक्रार दिली. त्यावरून गायकवाड यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान, आपले दुष्कृत्य बाहेर पडू नये, यासाठी गायकवाड यांनी युवकांना धमक्या दिल्या व खोट्या माहितीच्या आधारे विविध कलमांखाली तक्रार दिली. यानंतर गुन्हे दाखल झाले. या अधिकाऱ्यास तात्काळ बडतर्फ करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, युवकांविरुद्धच्या तक्रारी मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. संजय गोलेच्छा, भरत कोठारी, योगेश कोठारी, महावीर पहाडे, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, निशांत अगरवाल, प्रसन्न जैन, दीपक देसाई, पंकज मुंदडा या युवकांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी मागविला लेखी खुलासाफलक वादप्रकरणी नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबत २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करावा, अशी नोटीस अमळनेर न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांना बजावली आहे.

समाजामधील समतोल बिघडविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर अशांविरुद्ध सरकारने ताबडतोब कारवाई करावी.-विजय दर्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा. जैन समाज

अमळनेर येथील या घटनेबाबत देशभरातील जैन समाजामध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे. या दोषी अधिकाऱ्यास शिक्षा होईपर्यंत लढा देऊ.-ललित गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ 

टॅग्स :Jalgaonजळगावagitationआंदोलन