शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

महाराष्ट्रातील ८३ किल्ले बनले राज्य संरक्षित स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 04:58 IST

गड-किल्ले संवर्धन समितीचा निर्णय; ठाण्यातील ११, रायगडमधील ९ किल्ल्यांचा समावेश

पोलादपूर : महाराष्ट्र शासनाच्या गड-किल्ले संवर्धन समितीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्रातील ८३ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील ११, तर रायगड जिल्ह्यातील नऊ किल्ल्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती गडसंवर्धन समितीचे सदस्य अमर आडके यांनी दिली. ८३ किल्ल्यांपैकी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.पोलादपूर तालुक्यातील ढवळे विभागातील किल्ले चंद्रगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. चंद्रगड, कंगोरीगड या गडांवर गेल्या चार-पाच वर्षांत पर्यटक मोठ्या संख्येने येत असून ढवळे, चंद्रगड ते और्थर सेट महाबळेश्वर असा ट्रेक अनेकजण करतात, त्यामुळे चंद्रगडला विशेष महत्त्व आहे. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात आणला. जोर खोरे, ढवळे घाट, जावळी खोरे या सर्व विभागांवर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात होता. हा गड राज्य संरक्षित स्मारक झाल्याने सोयी-सुविधा उपलब्ध होऊन पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा आडके यांना आहे.गडसंवर्धन समितीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे किल्ले पहिल्या टप्प्यात संरक्षित करण्याचा निर्णय झाला. हे किल्ले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असूनही ते अनेक वर्षे संरक्षित केले गेले नव्हते. म्हणजे त्या किल्ल्यांना राज्य संरक्षित स्मारक हा दर्जा नव्हता. ज्या असंरक्षित किल्ल्यांवर अवशेष शिल्लक आहेत व ज्यांचा पुरातत्त्वीय संकेतानुसार विकास करण्यास वाव आहे, असे असंरक्षित किल्ले महाराष्ट्र शासनाने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी समिती सदस्यांनी ६ एप्रिल २०१६ रोजी केली होती, अशी माहिती आडके यांनी दिली. त्यानुसार बैठकीमध्ये पुढील किल्ले लवकरात लवकर संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.पहिल्या टप्प्यातील किल्लेठाणे जिल्हा - तारापूर, केळवे, माहिम, तांदूळवाडी, कोहोज, अशेरी, गोरखगड, गंभीरगड, सेगवा, भवानगड, मलंगगडरायगड जिल्हा - खांदेरी, थळ, सागरगड, साम्राजगड, कर्नाळा, मृगगड, सांकशी, सरसगड, पेब, चंद्रगडरत्नागिरी जिल्हा - कनकदुर्ग, साटवली, पालगड, महिपतगड, सुमारगड, नवते किंवा गुढे किल्लासिंधुदुर्ग जिल्हा - देवगडसातारा जिल्हा - चंदन, वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संतोषगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगडसांगली जिल्हा - प्रचितगड, भूपाळगड, मच्छींद्रगडकोल्हापूर जिल्हा - शिवगड, कलानिधीगड, गंधर्वगड, पारगड, गगनगड, पावनगड, सामानगड, महिपालगडपुणे जिल्हा - तिकोना, तुंग, घनगड, हडसर, चावंड, रोहिडाअहमदनगर जिल्हा - बहादूरगड, हरिश्चंद्रगड, पट्टा, अलंग, कुलंग आणि मदननाशिक जिल्हा - कावनई, त्रिंगलवाडी, त्रिंबकगड, हर्षगड, भास्करगड, चौल्हेर, धोडप, हातगड, अहिवंतगड, रवळ्या, जवळ्या, माकंर्डेया, इंद्राई, राजदेहेर, चांदवड, डेरमाळऔरंगाबाद जिल्हा - सुतोंडा५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारकविशेष म्हणजे, या ८३ किल्ल्यांपैकी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. पुरातत्त्व विभागाने सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. अशा प्रकारे एकाच वेळी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या गडसंवर्धन समितीचे आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे हे यश आहे. या यादीत जे किल्ले नाहीत; पण ऐतिहासिक तसेच पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वाचे आहेत अशा किल्ल्यांची नावे पुढील टप्प्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

टॅग्स :FortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज