शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

राज्याला मिळाल्या दोन कोटी लसी, पण दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोससाठीच प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 08:20 IST

राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

मुंबई : संसर्गाची स्थिती नियंत्रणात असताना आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन कोटी लस मात्रा उपलब्ध आहेत. याखेरीज पहिला डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी एवढीच आहे. जानेवारीत लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून हा लस मात्रेचा सर्वाधिक साठा आहे.

राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाने मोहिमेची गती वाढविण्यासाठी लस साक्षरतेला सुरुवात केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, लसीकरणादरम्यान असा चढ-उताराचा काळ येतो. त्यामुळे लसीकरणचा वेग वाढविण्यासाठी तळागाळात जाऊन जनजागृती करावी लागते. त्यानुसार विशेष लसीकरण मोहीम हा विशेष सत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम गतीने सुरू आहे.

१०० टक्के मुंबईकरांनी घेतला पहिला डोसराज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, राज्याच्या सार्वजनिक लसीकरण केंद्रावर सध्या दोन कोटी लक्ष मात्रेचा साठा आहे; तर खासगी क्षेत्रात मात्र याचे प्रमाण ४५ ते ५० लाख इतके आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी मुंबईत पहिले १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय पुणे, भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण राबविण्यात आले आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त तर चार जिल्ह्यात सुमारे ७० टक्के लसीकरण झाले आहेत. जवळपास १६ जिल्ह्यांमध्ये ६० टक्के लसीकरण झाले आहे, तर नंदुरबार आणि बीड जिल्ह्यात केवळ ५७ टक्के लसीकरण झाले आहे.

राज्यात १० कोटी ५९ लाख लसवंतराज्यात शुक्रवारी ४,९४,५६५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण १० कोटी ५९ लाख ७७ हजार ९९० लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १२,९४,१५१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११,३२,३८६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तर राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ८१ लाख ८० हजार ३७ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ७२ लाख २० हजार ८०४ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४  वयोगटातील ३ कोटी ९० लाख ६७ हजार ४६ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ५० लाख ५७ हजार ६२३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.

राज्यात दहा हजारांवर सक्रिय रुग्णसंख्या राज्यात कोरोनाचे २,२७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ६४,७४,९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात शनिवारी ८३३  नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात ९७,६९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १००२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १० हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस