शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

राज्याला मिळाल्या दोन कोटी लसी, पण दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोससाठीच प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 08:20 IST

राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

मुंबई : संसर्गाची स्थिती नियंत्रणात असताना आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन कोटी लस मात्रा उपलब्ध आहेत. याखेरीज पहिला डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी एवढीच आहे. जानेवारीत लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून हा लस मात्रेचा सर्वाधिक साठा आहे.

राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाने मोहिमेची गती वाढविण्यासाठी लस साक्षरतेला सुरुवात केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, लसीकरणादरम्यान असा चढ-उताराचा काळ येतो. त्यामुळे लसीकरणचा वेग वाढविण्यासाठी तळागाळात जाऊन जनजागृती करावी लागते. त्यानुसार विशेष लसीकरण मोहीम हा विशेष सत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम गतीने सुरू आहे.

१०० टक्के मुंबईकरांनी घेतला पहिला डोसराज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, राज्याच्या सार्वजनिक लसीकरण केंद्रावर सध्या दोन कोटी लक्ष मात्रेचा साठा आहे; तर खासगी क्षेत्रात मात्र याचे प्रमाण ४५ ते ५० लाख इतके आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी मुंबईत पहिले १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय पुणे, भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण राबविण्यात आले आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त तर चार जिल्ह्यात सुमारे ७० टक्के लसीकरण झाले आहेत. जवळपास १६ जिल्ह्यांमध्ये ६० टक्के लसीकरण झाले आहे, तर नंदुरबार आणि बीड जिल्ह्यात केवळ ५७ टक्के लसीकरण झाले आहे.

राज्यात १० कोटी ५९ लाख लसवंतराज्यात शुक्रवारी ४,९४,५६५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण १० कोटी ५९ लाख ७७ हजार ९९० लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १२,९४,१५१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११,३२,३८६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तर राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ८१ लाख ८० हजार ३७ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ७२ लाख २० हजार ८०४ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४  वयोगटातील ३ कोटी ९० लाख ६७ हजार ४६ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ५० लाख ५७ हजार ६२३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.

राज्यात दहा हजारांवर सक्रिय रुग्णसंख्या राज्यात कोरोनाचे २,२७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ६४,७४,९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात शनिवारी ८३३  नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात ९७,६९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १००२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १० हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस